Perfect Tea Tips : चहा बनवताना दूध आधी टाकावं की नंतर ? घरी टपरीसारखा कडक चहा बनवा अन् 'या' सोप्या ट्रिक्स वापरून वाढवा चहाची चव!

मुंबई : पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की रिमझिम पावसात हातात गरमागरम चहाचा कप धरून बसण्याची मजा काही वेगळीच असते. त्यातही अद्रक आणि वेलचीचा सुगंध असलेला कडक चहा मिळाला, तर दिवसाचा थकवा पार निघून जातो. पण अनेकदा घरी कितीही प्रयत्न केले, तरी टपरीवर मिळणाऱ्या त्या खास चहासारखी चव आणि सुगंध घरी बनवलेल्या चहात येत नाही. कधी चहा अवाजवी कडू होतो, तर कधी पाणचट लागतो. याचे मुख्य कारण म्हणजे चहा बनवताना योग्य क्रम न पाळणे होय.



मसाले आणि अद्रक उकळण्याची योग्य पद्धत



पावसाळ्यात साध्या चहापेक्षा अद्रक, वेलची, दालचिनी किंवा काळीमिरी घातलेला चहा आरोग्यासाठी आणि चवीसाठी उत्तम मानला जातो. मात्र, हे मसाले टाकण्याची एक ठराविक पद्धत आहे. सर्वात आधी भांड्यात गरजेनुसार स्वच्छ पाणी घ्यावे आणि ते उकळू द्यावे. पाणी उकळू लागल्यावर त्यात ठेचलेले अद्रक आणि मसाले टाकावेत. यामुळे मसाल्यांचा अर्क पाण्यात पूर्णपणे उतरतो. पण लक्षात ठेवा, हे पाणी २ ते ३ मिनिटांपेक्षा जास्त उकळू नये, अन्यथा चहाला कडवटपणा येऊ शकतो. याच टप्प्यावर साखर टाकल्यास चहाचा पाया (Base) चांगला तयार होतो.



दूध कधी टाकावे ? आधी की नंतर ?



चहा बनवताना बहुतांश लोक सुरुवातीलाच दूध आणि पाणी एकत्र उकळायला ठेवतात, जी सर्वात मोठी चूक आहे. टपरीसारखा उत्तम स्वाद हवा असेल, तर मसाल्यांचे पाणी व्यवस्थित उकळल्यानंतरच त्यात दूध घालावे. आधी पाण्यामध्ये मसाले आणि अद्रक शिजवून घेतल्याने त्यांचा नैसर्गिक सुगंध बाहेर येतो. दूध टाकल्यानंतर गॅसची आच मंद करावी आणि मिश्रणाला थोडा वेळ उकळू द्यावे.



चहापत्ती आणि उकळण्याची वेळ



दूध टाकल्यानंतरच त्यात चहापत्ती घालावी. जर तुम्हाला कडक चहा आवडत असेल, तर चहापत्ती थोडा वेळ जास्त शिजवू शकता. मात्र, चहा अवाजवी वेळ उकळत ठेवल्यास त्याला कसैला किंवा अत्यंत कडू स्वाद येतो. त्यामुळे अद्रक आणि मसाल्यांचा स्वाद सुरुवातीलाच पाण्यात उतरवून घेतल्यास चहा जास्त वेळ उकळण्याची गरज भासत नाही.



चहाची चव दुप्पट करणारी एक छोटी ट्रिक



चहा पूर्ण तयार झाल्यावर गॅस बंद करावा. पण, तो लगेच कपात गाळण्याऐवजी भांड्यावर १ मिनिटासाठी झाकण ठेवावे. या एका मिनिटात चहामधील मसाल्यांचा सुगंध आणि वाफ आतल्या आत मुरते, ज्यामुळे चहाची चव अधिक समृद्ध होते. यानंतर गरमागरम चहा कपात गाळून पावसाळ्याच्या दिवसांत भजी, ब्रेड किंवा बिस्किटांसोबत त्याचा आस्वाद घ्यावा.

Comments
Add Comment

Shalarth ID Scam : 160 कोटींच्या घोटाळ्यात मोठा ट्विस्ट ! बोगस मान्यतांची पोलिसांकडून थेट पडताळणी

Shalarth ID Scam : राज्यात गाजत असलेल्या तब्बल १६० कोटी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला आता निर्णायक वळण

Devendra Fadnavis : नाशिकमधील खड्ड्यांवरून मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना झापले

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक; गुणवत्ता सुधारण्यासाठी एक महिन्याचा अल्टीमेटम मुंबई : आगामी

Nashik : महापालिकेच्या रुग्णालयांचा स्थायी समितीकडून पंचनामा, समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शनिवारी स्वतंत्र बैठक

Nashik : नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) बिटको, डॉ. झाकीर हुसेनसह अन्य रुग्णालयांतील आरोग्यसेवेच्या ढिसाळ कारभारावर

Saif Ali Khan : ५० व्या वर्षीही अविवाहित असलेली सैफ अली खानची बहीण सबा पटौदीचा लग्नाबद्धल मोठा खुलासा!

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान (Saif ali Khan) आणि अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Khan) यांची मोठी बहीण सबा पटौदी (Saba Pataudi) नेहमीच

Pratap Sarnaik : गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई :  श्री गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी

Devendra Fadnavis : तिसऱ्या मुंबईसाठी ३२४ चौ.कि.मी. क्षेत्राचा 'मास्टर प्लॅन'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये 'मॅपलट्री'कडून १.१ अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित मुंबई :