Antilia Explosives Case : सचिन वाझे, प्रदीप शर्मावर आरोप निश्चित, अँटिलिया स्फोटके प्रकरणाला गती

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार आढळल्याचे प्रकरण आणि त्यानंतर झालेल्या मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात कायदेशीर घडामोड समोर आली आहे. मुंबईच्या विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणा न्यायालयाने शनिवारी (१ ऑगस्ट ) या गाजलेल्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे, प्रदीप शर्मा यांच्यासह एकूण दहा जणांवर औपचारिकपणे आरोप निश्चित केले आहेत.



आरोपींनी स्वतःवर केलेले आरोप फेटाळत आपण निर्दोष असल्याचे म्हटल्यानंतर, विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी हे आरोप निश्चित केले. आता या सर्व आरोपींना हत्येचे गुन्हे आणि कठोर अशा 'यूएपीए' कायद्यांतर्गत खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. या अत्यंत बहुचर्चित आणि संवेदनशील प्रकरणात आता आरोप निश्चित झाल्यामुळे खटल्याच्या प्रत्यक्ष कामकाजाला आणि साक्षीदारांच्या जबाबांना गती मिळणार आहे. माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्यासह अन्य आठ आरोपी आता न्यायालयात कायदेशीर लढाई लढणार आहेत.



दक्षिण मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या बहुमजली निवासस्थानाबाहेर २५ फेब्रुवारी २०२१ रोजी एका एसयूव्ही कारमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर या कारचे मालक असल्याचे सांगणारे ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन हे ५ मार्च २०२१ रोजी ठाण्याच्या खाडीत मृतावस्थेत आढळले होते. या दोन्ही घटनांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते.



वाझेचा सहभाग


या प्रकरणाचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने आरोप केला आहे की, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यानेच उद्योगपतींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी केली होती. श्रीमंत व्यक्तींमध्ये दहशत निर्माण करून, एका उच्चपदस्थ राजकीय व्यक्तीने ठरवून दिलेले १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे मासिक उद्दिष्ट पूर्ण करणे हा यामागील मुख्य उद्देश होता. तसेच, स्वतःची 'सुपर कॉप' म्हणून गेलेली पत आणि प्रतिश प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी वाझेने हे कृत्य केले होते, असेही तपास यंत्रणेने स्पष्ट केले.



मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट


एनआयएच्या आरोपानुसार, स्फोटकांच्या या प्रकरणात सर्व दोष आपल्यावर घ्यायला मनसुख हिरेन यांनी स्पष्ट नकार दिला होता. ते या कटाचा पर्दाफाश करू शकतात आणि ही साखळी तोडू शकतात, या भीतीपोटी हिरेन हे पोलिसांसाठी आणि या कटातील सूत्रधारांसाठी एक 'कमकुवत दुवा' ठरत होते. याच कारणातून सचिन वाझेने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने मनसुख हिरेन यांचा काटा काढण्याचा म्हणजेच त्यांच्या हत्येचा कट रचला.

Comments
Add Comment

Nashik Crime News : ...'तर पहिला खून तुमचा होईल,' नाशिकमध्ये व्यापाऱ्यांना बिश्नोई गँगच्या नावाने धमकी

Nashik Crime News : नाशिकच्या महात्मा गांधी रोडवरील क्रीडा साहित्य आणि वाद्य विक्री करणाऱ्या दोन व्यापारी बंधूंना तब्बल २

Rajasthan School Audit Report : राजस्थानमधील ६११ सरकारी शाळांना स्वतःची इमारतच नाही; विधानसभेत ऑडिट रिपोर्ट सादर

राजस्थानमधील सरकारी शाळांच्या पायाभूत सुविधांची अत्यंत दयनीय अवस्था विधानसभेत सादर करण्यात आलेल्या एका

Nashik Crime News : मोबाइलचे नेटवर्क गेले अन् खाते रिकामे झाले, नाशिकच्या कंत्राटदाराचे ५०.४७ लाख गायब

Nashik Crime News : नाशिकमधील एका कंत्राटदाराच्या मोबाइलचे नेटवर्क अचानक बंद पडल्यानंतर अवघ्या काही दिवसांत त्यांच्या बँक

CM Devendra Fadnavis : नवी मुंबईत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रभक्तीकडे वळण्याचे आवाहन

ठाणे : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील

Nashik : वीजचोरीविरोधात महावितरणची धडक कारवाई, जिल्ह्यात एकाच दिवशी १४ जणांवर गुन्हे दाखल

Nashik : वीजचोरी करून व्यावसायिक वापर करणाऱ्यांविरोधात महावितरणच्या (Mahavitran) नाशिक भरारी पथकाने धडक कारवाई केली असून,