Ajit Doval : हक्कांविषयी बोलणाऱ्यांनी हक्कांचा गैरवापर केला तर... तरुणांविषयी नेमकं काय म्हणाले NSA अजित डोवाल ?

पुणे : यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना देण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर अजित डोवाल यांनी त्यांच्या भाषणातून तरुणाईला थेट संबोधित केले. तसेच लोकमान्य टिळकांच्या कार्याचा गौरव केला.



टिळकांचे कार्य समजून घेण्यासाठी त्यावेळच्या परिस्थितीचा आणि अडचणींचा आधी विचार करावा लागेल. आपण त्या स्थितीची आता व्यवस्थित कल्पनाही करू शकत नाही. देशातल्या तरुण पिढीला वाटतं की भारत आधीपासून असा आहे. स्वातंत्र्य म्हणजे आताच्या तरुणाईच्या मते त्यांच्या इच्छेनुसार वागणे... पण हे स्वातंत्र्य नाही. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं, संघर्ष केला, नेतृत्व दिलं त्यात लोकमान्य टिळक आघाडीवर होते.



स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांच्या मनात संताप होता. पण बोलण्याची अनेकांची हिंमत नव्हती. लोकांच्या मनात राग होता. पिडा होती. वेदना होती. पण कसे व्यक्त व्हावे ते समजत नव्हते. जे बोलत होते त्यांना मार्ग निघेल, प्रश्न सुटेल असे वाटत होते पण स्वातंत्र्यासाठी लढण्याची हिंमत कोणी दाखवत नव्हते. जे लढत होते ते संघटीत नव्हते. योग्य दिशा देईल असे नेतृत्व नव्हते. या परिस्थितीत लोकमान्य टिळकांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले. नेतृत्व करताना जे त्रास, वेदना सहन कराव्या लागल्या ते सर्व टिळकांनी सहन केले.


हल्ली लोकं हक्कांबद्दल बोलतात, पण त्याचा चुकीचा वापर होत असेल तर ते हक्क मिळवण्यासाठी ज्यांनी रक्त सांडलं, सर्वस्व दिलं, त्यांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील ? आज लोकमान्य टिळक आपल्यात असते तर त्यांनी काय नवा संदेश दिला असता. भारताला सशक्त आणि विकसित भारत बनवणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, आणि मी हे करणारच असं ते म्हणाले असते, असं डोवाल म्हणाले.



कोण आहेत अजित डोवाल ?


अजित डोवाल हे २०१४ पासून भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. त्यांनी याआधी प्रदीर्घ काळ गुप्तचर दलात अधिकारी पदावर काम केले आहे. ते १९६८ च्या बॅचचे केरळ कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी २००४ ते २००५ या काळात आयबी प्रमुख म्हणून काम केले आहे. तसेच पाकिस्तानमध्ये सात वर्षे गुप्तचर म्हणून काम केले आहे. ऑपरेशन ब्लॅक थंडर अंतर्गत त्यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लपलेल्या दहशतवाद्यांची माहिती मिळवली होती. या माहितीमुळे सुरक्षा यंत्रणेला कारवाई करणे सोपे झाले होते. मिझोराम आणि मणिपूरमधील बंडखोरी मोडून काढण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. काश्मीरमधील दहशतवाद नियंत्रणात आणण्यातही त्यांची महत्त्त्वाची भूमिका आहे. किर्ती चक्र मिळवणारे ते पहिले आयपीएस आहेत. सध्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे.

Comments
Add Comment

Nashik Crime News : पॉक्सो प्रकरणात मदतीसाठी २० हजारांची लाच; सुरगाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा पोलीस ठाण्यातील (Surgana Police Station) एका पोलीस उपनिरीक्षकाला पॉक्सो (POCSO) प्रकरणात मदत

राष्ट्रकुल खेळ २०२६: बॉक्सिंगमध्ये भारताचा सुवर्णधमाका; प्रीती पवार आणि जास्मिन लांबोरिया ठरल्या सुवर्णकन्या!

ग्लासगो : राष्ट्रकुल खेळ २०२६ च्या दहाव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. रिंगण गाजवत

Devendra Fadnavis : "एका धुरंधराला पुरस्कार देण्यासाठी..." ; पुण्यातील फडणवीसांच्या भाषणाची जोरदार चर्चा; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री

पुणे : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय गृहमंत्री

Shirdi : साईचरणी गुरूपौर्णिमा उत्सवात कोट्यवधींची गुरूदक्षिणा; दान केलेले सोन्याचे अलंकार तुम्ही पाहिलेत का ?

 Shirdi :  शिर्डीच्या साईबाबा मंदिरात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी झाली असून लाखो भाविकांनी दर्शन घेतल्याचे

Iran - America War : इराणविरोधात ट्रम्प यांचा मोठा डाव? अमेरिकन लष्कराला नव्या कारवाईचे आदेश; मध्यपूर्वेत पुन्हा तणाव वाढला

वॉशिंग्टन : अमेरिका (America)आणि इराण (Iran) यांच्यातील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड

Amit Satam : एकही आमदार-खासदार नसलेल्या राज ठाकरेंच्या मेंदूचे फूटप्रिंट काढण्याची गरज

अमित साटम; शिवउद्योग स्थापन करून किती मराठी तरुणांना उद्योगधंदे दिले? मुंबई : उच्च व