Raj Thackeray : सिद्धिविनायक मंदिरातून १८ कोटींची लूट, राज ठाकरेंचा आरोप; न्यासाच्या अध्यक्षांनी फेटाळला आरोप

मुंबई : सिद्धिविनायक मंदिर (Siddhivinayak Temple) न्यासाच्या दानपेटीतून दरवर्षी तब्बल १८ कोटी रुपयांची लुटालूट होत असल्याचा गंभीर आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. न्यासाच्या विश्वस्तांनीच यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली असल्याचे सांगत, या प्रकरणाचे धागेदोरे वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचल्याचा दावाही त्यांनी केला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या २० व्या वर्धापनदिन मेळाव्यात ते बोलत होते. राज ठाकरेंचा आरोप श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी फेटाळला आहे.



कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, भाविक श्रद्धेने मंदिरात दान टाकतात, परंतु तिथेच कर्मचारी चोरी करताना पकडले गेले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्यापूर्वी दर बुधवारी दानपेटीची मोजदाद ५० लाखांच्या आत भरत होती. मात्र, कारवाईनंतर हीच रक्कम दीड कोटी रुपयांवर पोहोचली आहे. याचा अर्थ उर्वरित रक्कम लंपास केली जात होती आणि वर्षाला सुमारे १८ कोटी रुपयांचे नुकसान न्यासाचे होत होते. राहुल लोंढे, मीना कांबळी, गोपाळ दळवी आणि सुदर्शन सांगळे या विश्वस्तांनी स्वतः उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केल्याचे त्यांनी नमूद केले.



या वेळी राज ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवरही टीका केली. नीट परीक्षेतील गोंधळ, शिक्षणावरील घटता खर्च आणि बेरोजगारीमुळे तरुण-तरुणींमध्ये तीव्र संताप असल्याचे त्यांनी सांगितले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना, त्यांना फिंगरप्रिंट आणि फूटप्रिंटमधील फरक कळत नसल्याची टीका त्यांनी केली. तसेच रस्ते, पाणी, शिक्षण व आरोग्य या मूलभूत सुविधांअभावी तरुण देश सोडून जात असून, सरकारने या वास्तविक प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.



सिद्धिविनायक मंदिरात आर्थिक गैरव्यवहार नाही


श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासामध्ये कोणताही आर्थिक गैरव्यवहार किंवा घोटाळा झालेला नाही, असा खुलासा न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी केला आहे. काही विश्वस्तांनी सरकारला दिलेल्या पत्रामुळे नागरिकांमध्ये गैरसमज पसरला असून, मंदिर न्यासाचा कारभार अत्यंत पारदर्शक आणि उत्कृष्ट पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाविकांकडून दर्शनासाठी ऑनलाईन माध्यमातून पैसे घेणाऱ्या ९ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

Comments
Add Comment

Delhi Earthquake : दिल्ली हादरली! पहाटे २.९ तीव्रतेचा भूकंप; अरुणाचल आणि आसाममध्येही जाणवले धक्के

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली रविवारी (२ ऑगस्ट) पहाटे सौम्य भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली. पहाटे ४.१४ वाजता

Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे

Gold News : आता लॉकरमध्ये पडलेल्या सोन्यातून मिळणार नफा! वर्षाला ४% अतिरिक्त सोनं मिळवण्याची नवी योजना; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

मुंबई : भारतीय कुटुंबांमध्ये सोन्याला गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय मानले जाते. अनेकजण भविष्यातील गरज

Maharashtra Freedom of Religion Bill : महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी, आता आंतरधर्मीय विवाह झाल्यास अपत्याला आईचा धर्म मिळणार

मुंबई : सक्तीने किंवा फसवून केल्या जाणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या

ST BUS : आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती!

५५०० बसेसद्वारे ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांचा सुखरूप, सुरक्षित प्रवास मुंबई : ‘पंढरीची वारी’ (Pandharpur Wari) ही

Commonwealth Games 2026 : ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारतानं जिंकली ३९ पदकं, समारोप सोहळ्यात दिसेल अहमदाबाद २०३० ची झलक

ग्लासगो : स्कॉटलँडच्या ग्लासगो शहरात सुरू असलेल्या राष्ट्रकुल २०२६ अर्थात