Nitesh Rane : १५ ऑगस्टपर्यंत राज्याच्या सागरी हद्दीत कोणत्याही प्रकारची मासेमारी करता येणार नाही!

मंत्री नितेश राणे यांचा पुनरुच्चार; मच्छीमारांना सहकार्याचे आवाहन


मुंबई : महाराष्ट्र सरकारने १५ ऑगस्टपर्यंत राज्याच्या सागरी हद्दीत मासेमारीवर पूर्णपणे बंदी घातली असून, या नियमाचे सर्वांनी काटेकोर पालन करावे, असा पुनरुच्चार राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शुक्रवारी केला. १२ नॉटिकल मैल या राज्याच्या सागरी हद्दीत कोणत्याही प्रकारच्या मासेमारीला परवानगी नसून, मच्छीमार बांधवांनी या कालावधीत समुद्रात न उतरता शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.



राज्य सरकारच्या (State Government) मत्स्यव्यवसाय विभागाचे सर्व अधिकारी यासंदर्भात पूर्णपणे सतर्क आणि सज्ज आहेत. बंदीच्या या काळात राज्याच्या हद्दीत जाऊन कोणीही मासेमारी करणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. तसेच, या कालावधीमध्ये मासेमारीसाठी लागणारे डिझेल, पास किंवा कूपन यांसारखे कोणतेही सहकार्य महाराष्ट्र सरकारच्या मत्स्य खात्याच्या वतीने कोणालाही दिले जाणार नाही, असे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

मासेमारी बंदीचा हा काळ पाळल्यामुळे सागरी जीवांचे प्रजनन योग्य रीतीने होऊन मत्स्योत्पादनात मोठी वाढ होते. याचा फायदा पुढे जाऊन मच्छीमारांच्या आर्थिक उन्नतीसाठीच होणार आहे. त्यामुळे सर्व मच्छीमार बांधवांनी १५ ऑगस्टपर्यंत ही बंदी प्रामाणिकपणे पाळावी आणि मत्स्य खात्याला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री राणे यांनी केले.
Comments
Add Comment

Duleep Trophy : दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात येणार

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफी २०२६-२७ चा अंतिम सामना आता बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) ऐवजी चेन्नई येथील एम. ए.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम! पुढील ३ दिवसांचा हवामान अंदाज जारी

राज्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या नव्या अंदाजानुसार आगामी तीन दिवस महाराष्ट्रातील

Manu Bhaker : ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर महाकालच्या चरणी

उज्जैन : ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकरने मध्य प्रदेशातील उज्जैन येथील जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग भगवान

Justice Yashwant Varma : न्या. यशवंत वर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी

नवी दिल्ली : न्यायिक उत्तरदायित्व आणि सुधारणांसाठी अभियान (सीजेएआर) यांनी अलाहाबाद हायकोर्टाचे माजी

Akshaye Khanna : धुरंधरचा 'रहमान डकैत' आता गुरु शुक्राचार्यांच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना त्याच्या नवनवीन आणि आव्हानात्मक भूमिकांसाठी चर्चेत आला. 'छावा'मधील 'औरंगजेब'

BWF World Championships : महिला आणि पुरुष एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात; पीव्ही सिंधू आणि आयुष शेट्टीला पराभवाचा धक्का

नवी दिल्ली : २०२६ च्या बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिपमध्ये २० ऑगस्ट हा भारतासाठी निराशाजनक दिवस ठरला. महिला एकेरी,