Ujani Dam : निम्मा पाऊस आणि तरीही उजणी तुडुंब ; प्रशासनाचा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सोलापूर : जिल्ह्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला असला, तरी उजनी धरणाने यंदा विक्रमी वेगाने भरतीकडे वाटचाल केली आहे. सोमवारी (२७ जुलै) रात्री ९ वाजेपर्यंत धरणातील उपयुक्त पाणीसाठा ९८.५७ टक्क्यांवर पोहोचला. पूरस्थिती टाळण्यासाठी धरण प्रशासनाने रात्री १०.३० वाजता धरणाचे १६ दरवाजे उघडत भीमा नदीपात्रात ४० हजार क्युसेक (cusec)पाण्याचा विसर्ग सुरू केला.(Solapur Ujani Dam)



यंदा उजनीच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस झाला नाही. मात्र, पुणे जिल्हा आणि धरणाच्या वरच्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाली. ८ जुलैपासून धरण 'प्लस'मध्ये गेले असून, त्यानंतर सातत्याने वाढणाऱ्या आवकेमुळे उजनी गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १३ दिवस आधी पूर्ण क्षमतेच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.


धरणात भरपूर पाणीसाठा झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असले, तरी जलतज्ज्ञांनी नियोजनाबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. गतवर्षीही धरण पूर्ण भरले होते; मात्र पाण्याचे योग्य व्यवस्थापन न झाल्याने उन्हाळ्यात उपयुक्त पाणीसाठा उणे २८ टक्क्यांपर्यंत घसरला होता. त्यामुळे यंदाही पाण्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.


धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भीमा नदीच्या पात्रात किंवा काठावर जाणे टाळावे, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे. नदीपात्रातील जनावरे, शेतीची अवजारे आणि इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावे. सखल भागातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सतर्क राहावे, असे कार्यकारी अभियंता सु.उ.डुंबरे यांनी सांगितले.


दरम्यान, स्थानिक पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पुढील काही तासांत किंवा दिवसांत आवक वाढल्यास भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात आणखी वाढ करण्याची शक्यता धरण प्रशासनाने वर्तवली आहे.


 
Comments
Add Comment

Jaiswal, Fernando : आयसीसीची यशस्वी जैस्वाल आणि असिथा फर्नांडोवर दंडात्मक कारवाई

कोलंबो : दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मैदानावर झालेल्या झटापटीनंतर भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि

INDvsSL : श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो कसोटीवर भारताची मजबूत पकड

कोलंबो : भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत आपले स्थान मजबूत केले आहे. देवदत्त पडिक्कलच्या शतकानंतर

Maharashtra Cabinet Decisions : नागपूरमध्ये लता मंगशेकर विद्यापीठ, खेळाडूंच्या रोख बक्षीस धोरणात सुधारणा यांसह राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत जनहिताचे

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आतापर्यंत साडेबारा लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना दहा हजार ११५ कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीच्या लाभाचे वितरण

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ६,३६,०३६ पात्र

Thane : राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन

ठाणे : शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

Jayakumar Gore : जिल्हा परिषद शाळांमधील मूलभूत सुविधांचा आढावा; कमतरता तातडीने दूर करण्याच्या सूचना

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद, शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आवश्यक