Shahapur Rain : शहापूरात पावसाचा कहर! हनुमान धबधब्यावर भीषण दुर्घटना; ५ पर्यटक वाहून गेले

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात (Shahapur Rain) झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे हनुमान धबधब्यावर मोठी दुर्घटना घडली आहे. अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात पाच पर्यटक वाहून गेले, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून एका पर्यटकाचा अद्याप शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुरबाड, कल्याण, शहापूर आणि भिवंडी परिसरातील सुमारे ३०० ते ४०० पर्यटक रविवारी चोंढे येथील हनुमान धबधबा पाहण्यासाठी आले होते. दुपारच्या सुमारास अचानक ढगफुटीसदृश पाऊस सुरू झाल्याने धबधब्याचा पाण्याचा प्रवाह काही क्षणांतच प्रचंड वाढला आणि पर्यटकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. (Shahapur Rain)



या दुर्घटनेत प्रसाद रमेश इंगळे, नितेश लहू पाटील आणि अजय कृष्णा मिरकुटे यांना स्थानिकांच्या मदतीने आणि बचाव पथकाच्या प्रयत्नांतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, आकाश महेंद्र देशमुख यांचा मृतदेह घटनास्थळी आढळून आला.


दरम्यान, दिनेश मेंडलकर हे अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध जीवरक्षक पथक, महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन संयुक्तपणे घेत आहेत. मुसळधार पावसामुळे बचावकार्याला अडथळे येत असले तरी शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. (Shahapur Rain)



या घटनेनंतर प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना पावसाळ्यात धबधबे, नद्या आणि ओढ्यांच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागानेही पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. (Shahapur Rain)




Comments
Add Comment

Ahilyanagar : नीट परीक्षेत कमी गुण मिळाले अन् विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले ; सुसाईड नोटमध्ये लिहिलं आत्महत्येचं कारण

Ahilyanagar : नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची

BENDUR FESTIVAL : सर्जा-राजाप्रती कृतज्ञतेचा उत्सव; महाराष्ट्रातील पारंपरिक 'बेंदूर' सणाची परंपरा आणि महत्त्व

भारतीय संस्कृती ही कृषीसंस्कृतीवर आधारलेली असून, या मातीतील प्रत्येक सण-उत्सव हा थेट प्रकृती आणि

Maharashtra Monsoon Weather : पावसाचा पुन्हा जोर! पुढील २४ तास अतिमहत्त्वाचे; महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

मुंबई : जुलैच्या अखेरच्या आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. उत्तर-पश्चिम

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Dog Attack : रेबीजमुळे चिमुकल्या समर्थ स्वामीचा दुर्दैवी मृत्यू; भटक्या कुत्र्यांवर कारवाईची मागणी

सोलापूर : भवानी पेठ परिसरातील घोंगडे वस्ती येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या समर्थ स्वामी या

Amravati News : धक्कादायक! आश्रमशाळेतील ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; जेवणानंतर उलट्या, पोटदुखीने उडाली खळबळ

अमरावती : अमरावतीच्या मेळघाट परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धारणी तालुक्यातील टीटंबा येथील शासकीय