Constitution Amendment : गेल्या 12 वर्षांत आठ घटना दुरुस्त्या, सरकारची संसदेत माहिती

नवी दिल्ली : गेल्या बारा वर्षांत भारताच्या राज्यघटनेत आठ वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही दिली. (Constitution Amendment)

अधिनियमित करण्यात आलेल्या संबंधित घटनादुरुस्ती विधेयकांचा तपशील पुढीलप्रमाणे :

1. भारताच्या राज्यघटनेची (99 वी दुरुस्ती) अधिनियम, 2014 (सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांतील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी विद्यमान कोलेजियम प्रणालीच्या जागी राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग स्थापन करण्यासंबंधी.

2. भारताच्या राज्यघटनेची (100 वी दुरुस्ती) अधिनियम, 2015 (भारत आणि बांगलादेश यांच्यातील भू-सीमा कराराशी संबंधित. (Indian Constitution,)

3. भारताच्या राज्यघटनेची (101 वी दुरुस्ती) अधिनियम, 2016 (देशातील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी ) शी संबंधित).

4. भारताच्या राज्यघटनेची (102 वी दुरुस्ती) अधिनियम, 2018 (राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा प्रदान करण्यास संबंधित). (Parliament News)

5. भारताच्या राज्यघटनेची (103 वी दुरुस्ती) अधिनियम, 2019 (सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षणाशी संबंधित).

6. भारताच्या राज्यघटनेची (104 वी दुरुस्ती) अधिनियम, 2019 (लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी जागांचे आरक्षण आणखी दहा वर्षांसाठी, म्हणजेच 25 जानेवारी, 2030 पर्यंत वाढविण्यास संबंधित). (Rajya Sabha)

7. भारताच्या राज्यघटनेची (105 वी दुरुस्ती) अधिनियम, 2021 (राज्यघटनेच्या अनुच्छेद 342A मध्ये दुरुस्ती तसेच त्यानुषंगाने राज्यघटनेच्या अनुच्छेद 338B आणि 366 मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्त्यांशी संबंधित).

8. भारतीय राज्यघटनेची (106 वी दुरुस्ती) अधिनियम, 2023 (लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी जागांचे आरक्षण करण्यास संबंधित). (Parliament Session)

 

 
Comments
Add Comment

Kargil Vijay Diwas : कारगिलपासून ऑपरेशन सिंदूरपर्यंत! भारतीय लष्कराच्या 'या' १० मोहिमांनी जगाला दाखवली ताकद

ऑपरेशन विजय (1999) (Operation Vijay) कारगिल युद्धात पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावत भारताने २६ जुलै १९९९ रोजी विजय

India Hydrogen Train : भारताच्या हायड्रोजन रेल्वेची यशोगाथा, तीन हजार लिटर डिझेलऐवजी निव्वळ पाण्याची वाफ

नवी दिल्ली : दिल्लीजवळील जिंद आणि सोनीपत या स्थानकांदरम्यान 17 जुलै 2026 रोजी भारताच्या पहिल्या हायड्रोजन

UNESCO World Heritage : सारनाथ या प्राचीन बौद्ध स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला आनंद

नवी दिल्ली : दक्षिण कोरियातील बुसान येथे सुरू असलेल्या 'जागतिक वारसा समिती'च्या 48 व्या बैठकीत, भारताने 2025-26 या

PoK India : पीओके भारताचा अविभाज्य भाग; पाकिस्तानसोबत फक्त याच मुद्यावर चर्चा - राजनाथ सिंह

कारगिल : भारत पाकिस्तानसोबत केवळ पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर (पीओके) या मुद्द्यावरच चर्चा करेल असे

Kargil Vijay Diwas : राष्ट्रपती, पंतप्रधानांसह मान्यवरांकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर योद्ध्यांना श्रद्धांजली

नवी दिल्ली : कारगिल विजय दिनानिमित्त (Kargil Vijay Diwas) कृतज्ञ राष्ट्र आज वीर जवानांना अभिवादन करत आहे. यावर्षीचा मुख्य

Kargil Vijay Diwas : कारगिल ते ऑपरेशन सिंदूर! २७ वर्षांत भारतीय सैन्याची युद्धनीती कशी बदलली?

नवी दिल्ली : २६ जुलै हा दिवस भारतासाठी अभिमानाचा मानला जातो. याच दिवशी १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात (Kargil War)