Ashadhi Wari : ‘कापडी पिशवीची वारी’तून पर्यावरण आणि समतेचा संदेश; विशेष विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना वारकऱ्यांची दाद

मुंबई : यंदाच्या आषाढी वारीत भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक समावेशकतेचा संदेश देणारा एक अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘कापडी पिशवीची वारी’ या संकल्पनेद्वारे प्लास्टिकमुक्त वारीचा संदेश देतानाच विशेष विद्यार्थ्यांच्या कलेलाही व्यासपीठ मिळाले आहे.



या उपक्रमात नरेपार्क विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने आणि मेहनतीने विठ्ठलाच्या विविध प्रतिमांनी सजवलेल्या कापडी पिशव्या तयार केल्या आहेत. या पिशव्यांचे डिझाइन तयार करण्यासाठी प्रभादेवी येथील रचना संसद अप्लाइड आर्ट महाविद्यालयातील तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. त्यांच्या संकल्पनांवर आधारित आकर्षक चित्रे विशेष विद्यार्थ्यांनी कापडी पिशव्यांवर साकारली आहेत.



या उपक्रमाचा उद्देश केवळ कापडी पिशव्यांचा वापर वाढवणे नाही, तर पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणे आणि विशेष मुलांच्या कलागुणांना समाजासमोर आणणे हाही आहे. प्रत्येक पिशवीतून पर्यावरणाची काळजी, स्वच्छतेचे महत्त्व आणि सर्वांना समान संधी मिळावी हा संदेश दिला जात आहे.



श्रीरंग ट्रस्टचे डॉ. सुमित पाटील यांनी यावेळी सांगितले की, विठ्ठल हा केवळ श्रद्धेचा विषय नसून निसर्गाशी जोडणारी भावना आहे. झाडे, नद्या, पक्षी, प्राणी आणि संपूर्ण सृष्टीत विठ्ठलाचे अस्तित्व असल्याची भावना जपली पाहिजे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करून कापडी पिशव्यांचा स्वीकार करणे हीच निसर्गसेवा आणि विठ्ठलसेवा असल्याचे त्यांनी सांगितले.


वारीदरम्यान या पिशव्यांच्या माध्यमातून वारकऱ्यांमध्ये पर्यावरणपूरक सवयींचा प्रसार केला जाणार आहे. विशेष विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या कलाकृती त्यांच्या आत्मविश्वासाचे आणि समाजातील सक्रिय सहभागाचे प्रतीक ठरत आहेत.


यावेळी आर्थर रोड परिसरातील पारशीवाडी मित्र मंडळानेही विशेष विद्यार्थ्यांसोबत या उपक्रमात सहभाग घेतला. तसेच रचना संसद महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. अदिती झा याही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.


Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी