CM Devendra Fadnavis : दिल्लीतील आंदोलनाआडून काहींचा अराजकता पसरवण्याचा प्रयत्न

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; 'नीट' परीक्षेशी देणेघेणे नसलेले अनेकजण आंदोलनात


मुंबई : दिल्लीत ‘नीट’च्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन देशात अराजकता पसरवण्याचा आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न काही घटकांकडून केला जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला. संविधानाने दिलेल्या हक्कांसोबतच नागरिकांनी आपल्या जबाबदाऱ्यांचे भान ठेवणे आवश्यक आहे, असे नमूद करतानाच या आंदोलनात शिरलेल्या अनेक लोकांना ‘नीट’ परीक्षा काय आहे किंवा ती कधी झाली, याची साधी माहितीही नाही, असा टोला त्यांनी लगावला. (CM Devendra Fadnavis)



मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लोकशाहीत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि परवानगी घेऊन केलेल्या आंदोलनांना सरकार नेहमीच सहकार्य करते. मात्र, जाणीवपूर्वक राजकीय अशांतता निर्माण करण्यासाठी विनापरवानगी आंदोलने करणे, हिंसेचा मार्ग अवलंबणे आणि पोलिसांवर दगडफेक करणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. दिल्लीतील आंदोलनाला कोणतेही स्पष्ट नेतृत्व नसल्यामुळे काही असामाजिक प्रवृत्तींनी त्याचा गैरफायदा घेतला. पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप करून अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली नसती, तर तिथे मोठा अनर्थ घडला असता. या आंदोलनात सर्वच लोक वाईट हेतूने आले आहेत असे नाही, काही नागरिक चांगल्या भावनेने सहभागी झाले असले, तरी ज्या राजकीय पक्षांना जनतेने नाकारले आहे ते पक्ष आणि काही संघटना अराजकता माजवण्यासाठी या आंदोलनाचा वापर करत असल्याचे चित्र उघड झाले आहे.( NEET Protest)



दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या जीवनावर आधारित एका विशेष चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. दादांचे लहानपण, कुटुंब आणि राजकीय कारकीर्द दर्शवणारे हे प्रदर्शन अत्यंत भावूक आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले. याच कार्यक्रमाच्या वेळी बोलताना, शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात येणाऱ्या कर्जमाफीच्या निर्णयाबाबत विचारले असता, सहकार विभागाने सर्व तयारी पूर्ण केली असून अजितदादांच्या जयंतीनिमित्त शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहील, अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. ( Delhi Protest)

Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून