वर्धा : वर्धा (Wardha) जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) रविवारी उशिरा रात्री भीषण अपघात (Accident) घडला. या दुर्घटनेत (Accident) पाच जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला, तर एक जण गंभीर जखमी (Injured) झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मालवाहू वाहनाने (Goods Vehicle) कारला (Car) मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडकेनंतर कारने पेट घेतल्याने चार प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर मालवाहू वाहनातील एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे.
अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प
घटनेनंतर समृद्धी महामार्गावरील वाहतूक (Traffic) काही काळ पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने (Administration) एका बाजूने टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू केली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस (Highway Police), पुलगाव पोलीस (Pulgaon Police) आणि अग्निशमन दल (Fire Brigade) घटनास्थळी दाखल झाले. जखमीला तातडीने रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून पोलिसांनी (Police) घटनेचा तपास (Investigation) सुरू केला आहे.
वर्धा: टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा जागीच मृत्यू
.
.
.#prahaarnewsline #MarathiNews #accident #SamruddhiMahamarg #RoadAccident pic.twitter.com/dvHNp9CqZn
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) July 20, 2026
अपघातामागे वाहतूक वळवण्याचा परिणाम?
प्राथमिक माहितीनुसार, इथेनॉल (Ethanol) घेऊन जाणारा टँकर (Tanker) यापूर्वीच पलटी झाला होता. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली होती. रात्रीच्या अंधारात समोरील वाहनाचा अचूक अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटिनावर (Argentina) 1-0 असा थरारक विजय मिळवत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. अतिरिक्त वेळेच्या 106 ...
अपघात नेमका कसा घडला?
वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर इथेनॉल वाहून नेणाऱ्या ट्रकचा (Truck) आधीच अपघात झाला होता. त्यामुळे तो महामार्गावर उभा होता आणि वाहतूक वळवण्यात आली होती. याचदरम्यान पुण्याहून (Pune) वर्ध्याकडे येणारी भरधाव कार (Car) ट्रकला धडकली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांना आग (Fire) लागली.
या आगीत ट्रकचालक (Driver) आणि क्लिनर (Cleaner) यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. तसेच कारमधील चार प्रवासी वाहनातच अडकले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की मृतदेह बाहेर काढण्यासाठी कार कापावी लागली.
मृतांमध्ये दोन जुळ्या बहिणींचा समावेश
प्राथमिक माहितीनुसार, कारमधील चारही मृत वर्धा जिल्ह्यातील सालोड गावचे रहिवासी होते. मृतांमध्ये दोन जुळ्या बहिणींचा समावेश असून त्या उपचारांसाठी (Treatment) पुण्यात गेल्या होत्या. उपचारानंतर गावाकडे परतत असताना हा भीषण अपघात झाला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.