सोलापूर : आषाढी वारीतील सर्वाधिक आकर्षण असलेल्या सोहळ्यांपैकी एक असलेले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊली (Dnyaneshwar Maharaj Mauli) यांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण उद्या म्हणजेच मंगळवार २१ जुलै रोजी सकाळी ८ वाजता खुडूस फाटा (पानीव पाटी) येथे भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. या ऐतिहासिक आणि पारंपरिक सोहळ्यासाठी हजारो वारकरी, भाविक आणि नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Ashadhi Wari Ringan 2026)
शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला हा गोल रिंगण सोहळा ज्योतीराम वाघ आणि जयवंत सिद यांच्या शेतजमिनीत पारंपरिक पद्धतीने भरविण्यात येतो. माऊलींचा अश्व रिंगणात धावताच उपस्थित वारकरी "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात तल्लीन होतात. हा क्षण अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल होतात. (Ashadhi Wari Ringan 2026)
Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela : १२ वर्षानंतर नाशिकमध्ये होणारा नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक सोहळा न राहता याव्दारे स्थानिकांना ...
रिंगण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खुडूस ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांनी जय्यत तयारी पूर्ण केली आहे. रिंगणस्थळाची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, तात्पुरती शौचालये, आरोग्य सेवा, वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था तसेच भाविकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. (Ashadhi Wari Ringan 2026) पालखी मार्गावर विविध ठिकाणी आकर्षक स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून भगवे ध्वज, फुलांची सजावट आणि टाळ-मृदुंगाच्या गजरामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. ग्रामस्थांनी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विशेष तयारी केली असून, 'संत येती घरा, तोचि दिवाळी-दसरा' या संतवचनाची प्रचिती येथे येत आहे. (Ashadhi Wari Ringan 2026)
भाविकांसाठी अनेक ठिकाणी महाप्रसाद, फराळ, पिण्याचे पाणी आणि भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. सामाजिक संस्था, युवक मंडळे आणि स्वयंसेवक सेवाभावाने विविध जबाबदाऱ्या पार पाडत असून वारकऱ्यांच्या सेवेत स्वतःला झोकून देत आहेत. (Ashadhi Wari Ringan 2026)
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पावन सोहळ्यानिमित्त पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विकास, वारकरी सेवा आणि लोकभावनेचा समतोल साधणारी ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही रिंगण सोहळा शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक उपाययोजना केल्या असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. रिंगणानंतर पालखीचा पुढील प्रवास नियोजित मार्गाने पंढरपूरच्या दिशेने सुरू राहणार असून, आषाढी एकादशीपूर्वी संपूर्ण वारी भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. (Ashadhi Wari Ringan 2026)
आषाढी वारीतील हे दुसरे गोल रिंगण केवळ धार्मिक परंपरेचा भाग नसून वारकरी संप्रदायाच्या श्रद्धा, समता, सेवा आणि भक्तीचा जिवंत उत्सव मानला जातो. त्यामुळे या सोहळ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (Ashadhi Wari Ringan 2026)






