ST Bus Ticket Fare : एसटीचा प्रवास महागला! मुंबई, पुणेसह प्रमुख मार्गांचे नवे तिकीट दर जाहीर

मुंबई : राज्यातील लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) एसटी (ST) बसच्या तिकीट दरात (Ticket Fare) वाढ करण्यात आली आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीच्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर नवीन तिकीट दर लागू झाले आहेत. यामुळे अनेक प्रमुख मार्गांवरील प्रवासासाठी प्रवाशांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र, यापूर्वी साध्या (Ordinary) एसटी बससाठी लागू करण्यात आलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ (Seasonal Fare Hike) पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.



भाडेवाढीमागचं कारण काय?


सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे डिझेलच्या (Diesel) किमतीत झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यांमध्ये वाढ, वाहनांच्या सुट्या भागांचा (Spare Parts), टायर (Tyres) आणि देखभाल (Maintenance) खर्च वाढल्याने महामंडळावर आर्थिक ताण वाढला आहे. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंड सेवा (Service) देण्यासाठी भाडेवाढ आवश्यक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.



राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम (Financially Strong) करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल याची काळजी घेण्यात आली आहे.



पुणे, मुंबईसह प्रमुख मार्गांवरील तिकीट दर वाढले


नवीन दरांनुसार मुंबई, पुणे आणि नाशिक येथून सुटणाऱ्या अनेक महत्त्वाच्या मार्गांवरील तिकीट दर वाढले आहेत. मुंबई ते धुळे, मुंबई ते कोल्हापूर, मुंबई ते सातारा, मुंबई ते नाशिक तसेच पुणे ते कोल्हापूर, पुणे ते अहिल्यानगर आणि पुणे ते छत्रपती संभाजीनगर या मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता वाढीव भाडे भरावे लागणार आहे.



प्रमुख मार्गांचे जुने आणि नवे तिकीट दर



  • मुंबई ते सातारा: ₹४९८ → ₹५१५

  • मुंबई ते कोल्हापूर: ₹७३० → ₹७५५

  • मुंबई ते नाशिक: ₹३५५ → ₹३७०

  • मुंबई ते धुळे: ₹६६४ → ₹६८५

  • मुंबई ते चिपळूण: ₹४९८ → ₹५१५

  • मुंबई ते सोलापूर: ₹७७५ → ₹८००

  • पुणे ते कोल्हापूर: ₹४२१ → ₹४३५

  • पुणे ते अहिल्यानगर: ₹२३३ → ₹२४०

  • पुणे ते छत्रपती संभाजीनगर: ₹४५४ → ₹४७०

  • नाशिक ते पुणे: ₹४१० → ₹४२५

Comments
Add Comment

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)

Devendra Fadnavis : रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षांची मुदत, सर्व प्रकारची कारवाई थांबवली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा शिकणे बंधनकारक करण्यात आले असले, तरी विविध