Nashik : नाशिक शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहणार, धरण साठ्यात वाढ झाल्याने पाणी कपात रद्द

Nashik : यंदा पाऊस कमी होणार असल्याच्या चर्चामुळे आणि नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे नाशिक शहरात जून आणि जुलै महिन्यात तसेच आगस्टमध्ये दर दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नाशिक महापालिकेने घेतला होता. मात्र आता गंगापूर धरणातील (Gangapur Dam) पाणीसाठा वाढल्याने उद्या शनिवारी पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.



नाशिक महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर हिमगौरी आहेर-आडके (Mayor Himgauri Aher-Adke) त्यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी पार पडली. ही सभा सुरू असताना सभासदांनी शहरामध्ये दर शनिवारची सुरू असलेली पाणी कपात रद्द करण्याची मागणी केली. या मागणी वरती सभेमध्ये चर्चा करताना नगरसेवक गुरमित बग्गा, दिनकर पाटील, अजय बोरस्ते, हेमलता पाटील, राहुल दिवे आणि अन्य सदस्यांनी धरणाची एकूणच परिस्थिती बघता पाणी पातळी वाढलेली आहे, त्यामुळे पाणी कपात रद्द करण्यात यावी अशी मागणी केली.



या मागणी वरती प्रशासनाच्या वतीने माहिती देताना सांगण्यात आले की सध्याच्या परिस्थितीमध्ये गंगापूर धरण हे 71 टक्के भरले आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार अजून काही दिवस तरी धरण भरून द्यावे लागेल मात्र धरणातील पाणीसाठा ७१ टक्के असल्याचे लक्षात घेता महापौर हिमगौरी आहेर-आडके (Mayor Himgauri Aher-Adke) यांनी शनिवारी बंद ठेवण्यात येत असलेला पाणी पुरवठा दि. १८/०७/२०२६ पासुन नियमित सुरु ठेवणेबाबतचे निर्देश दिलेले आहे. त्यानुसार संपुर्ण नाशिक शहराचा शनिवारचा पाणी पुरवठा पुर्ववत सुरळीत सुरु राहणार आहे.

Comments
Add Comment

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर आगमन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

मुंबई : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे

Mumbai Local News : लोकलमध्ये महिलेला मारहाण करणाऱ्या पुरुषाला १२ तासांत अटक

मुंबई : लोकलमध्ये महिलेला मारहाण करत असलेल्या पुरुषाचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल होताच अवघ्या १२

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Boss Scam : अधिकारी बनून पैशांची मागणी; 'बॉस स्कॅम'पासून सावधान राहण्याचे केंद्राचे आवाहन

नवी दिल्ली : व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा इतर संदेशवहन माध्यमांचा वापर करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर

New IT Rules : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नवीन आयटी नियम कठोर, आक्षेपार्ह मजकूर हटवण्याची मुदत २४ तासांवरून थेट २ तासांवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी आक्षेपार्ह आणि संवेदनशील मजकूर हटवण्याच्या मुदतीत