Nashik : कृषी सेवा केंद्रांवर कारवाईचा धडाका, आणखी १३ परवाने निलंबित

Nashik : नाशिक जिल्ह्यात कृषी विभागाकडून कारवाईचा धडाका सुरूच असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कारवाईचा बडगा उगारण्यास पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. कृषी विभागाने (Agriculture Department) सुरू केलेल्या विशेष तपासणी मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणखी १३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे एप्रिल २०२६ पासून आतापर्यंत कृषी विभागाने केलेल्या कारवाईत खत विक्रीचे ९०, बियाणे विक्रीचे १०, कीटकनाशक विक्रीचे १२ असे एकूण ११२ परवाने निलंबित केले आहेत. ४२ परवाने कायस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. या संदर्भात चार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



नेमकं प्रकरण काय ?


नाशिक जिल्ह्यात कृषी विभागाने विशेष तपासणी मोहिम राबवली. मोहिमेदरम्यान कृषी सेवा केंद्रांमध्ये (Agricultural Service Centre) होत असलेले नियमांचे उल्लंघन जसे की शेतकऱ्यांच्या देयकावर स्वाक्षरी न घेणे, इ-पॉस साठ्यातील अनियमितता, भावफलक व साठाफलक अद्ययावत नसणे, अभिलेखे व्यवस्थित न ठेवणे, ‘एम’ अर्जातील देयके न देणे अशा काही गंभीर त्रुटी आढळून आल्या.


गंभीर त्रुटी असल्याकारणाने कृषी विभागाकडून संबंधित केंद्रचालकांना नोटिसा (Notices) बजावून सुनावणी घेण्यात आली. संबंधित केंद्रचालकांकडून असमाधानकारक खुलासे आढळल्याने संबंधित १३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित (Agro-service center licenses suspended) करण्यात आले. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाच्या कृषी निविष्ठांची किंवा जादा दराने विक्री होऊ दिली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई सुरू राहील, अशी माहिती कारवाई परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने (Ravindra Mane) यांनी दिली.



शेतकऱ्यांना आवाहन


अनेक कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची होणारी लूट आणि फसवणूक पाहता कृषी विभागाकडून (Agriculture Department) शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत कृषी सेवा केंद्रांकडूनच ((Authorized Agricultural Service Centre))  बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करावीत महत्त्वाचे म्हणजे खरेदीची पक्की पावती घ्यावी तसेच ‘फार्मर आयडी’द्वारेच खत खरेदी करावी. कोणत्याही केंद्राकडून नियमभंग होत असल्यास संबंधित कृषी अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण) किंवा कृषी अधिकारी, पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा. तसेच ७८२१०३२४०८ या जिल्हास्तरीय व्हॉट्सॲप क्रमांकावर (WhatsApp number) तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Nashik : कुंभमेळा पर्व काळात त्र्यंबकेश्वर मंदिर सुरूच राहणार, शाहिस्नानानंतर साधू-संतांना दर्शनात अडथळा नाही - कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह

Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्व काळात श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर बंद ठेवण्याचा कोणताही निर्णय

Nashik News : श्री कपालेश्वर मंदिरात भाविकांचा जनसागर उसळला ! दानपेट्यांमध्ये 'इतके' लाख जमा

Nashik News : पवित्र श्रावण महिन्यानिमित्त नाशिकच्या प्रसिद्ध श्री कपालेश्वर महादेव मंदिरात (Kapaleshwar Temple) भाविकांनी

Vaishya Vani Community : वैश्य वाणी समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक; मंत्री अतुल सावे यांचे अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश

मुंबई : वैश्य वाणी समाजातील पात्र व्यक्तींना शासनाच्या विविध योजना, सवलती आणि शासकीय लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी

Pune Viarl Video : बाईई... काय हा घाणेरडा प्रकार! महागड्या बेकरीमधून पेस्ट्री मागवली अन् निघाली.....

पुणे : नामांकित बेकरी किंवा हॉटेलमधून खाद्यपदार्थ घेताना ग्राहकांकडून स्वच्छता आणि गुणवत्तेची अपेक्षा केली

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीने जर्सीवर टेप लावून तो नंबर का लपवला? चाहतेही चक्रावले, उलटसुलट चर्चांना उधाण

भारतीय क्रिकेटमधील युवा स्टार वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) सध्या दुलीप ट्रॉफीतील पदार्पणामुळे चर्चेत आहे. अवघ्या १५

Siddharth Jadhav : "माझ्या मृत्यूची एवढी कसली घाई आहे तुम्हाला ?"; 'त्या' बातमीवरून सिद्धार्थ जाधव संतापला

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत