ब्रिस्टल: इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजी करत आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला आहे. अय्यरने या सामन्यात नाबाद ८० धावांची खेळी करत, इंग्लंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय कर्णधाराने केलेल्या सर्वोच्च धावसंख्येच्या विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. विराट कोहलीने २०२१ मध्ये अहमदाबाद येथे नाबाद ८० धावा करून हा विक्रम प्रस्थापित केला होता.
FIFA World Cup 2026 Quarter Final मध्ये फ्रान्सने (France) दमदार खेळ करत मोरोक्कोचा (Morocco) २-० असा पराभव केला आणि स्पर्धेच्या Semi Final मध्ये ऐतिहासिक प्रवेश केला. बोस्टन (Boston) येथे ...
डाव सावरला आणि विक्रमाची नोंद केली
सामन्याच्या सुरुवातीला भारतीय फलंदाजीचा गडगडलेला पवित्रा पाहता, अय्यरची ही खेळी अत्यंत महत्त्वाची ठरली. सुरुवातीलाच वैभव सूर्यवंशी (१५), इशान किशन (४) आणि अभिषेक शर्मा (१६) हे तडाखेबंद फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याने भारताची अवस्था ७ षटकांच्या आत ४८-३ अशी बिकट झाली होती. अशा कठीण प्रसंगी कर्णधार श्रेयस अय्यरने जबाबदारी स्वीकारत डाव सावरला. त्याने शिवम दुबे (२२) सोबत ५३ धावांची भागीदारी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले.
ENG vs IND : भारताचा इंग्लंड (England) दौरा निराशाजनक ठरला असून चौथ्या टी-20 (T20I) सामन्यात इंग्लंडने (England) भारताचा (India) तब्बल ९ विकेट्सनी (Wickets) पराभव करत पाच सामन्यांच्या ...
आदिल रशीदच्या गोलंदाजीवर आक्रमकता
अय्यरने आपल्या डावात ५ षटकार आणि ४ चौकार लगावले. त्याने १८ व्या षटकात लेग-स्पिनर आदिल रशीदच्या गोलंदाजीवर दोन षटकार आणि एक चौकार ठोकत २० धावा लुटल्या. मात्र, इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्यानंतर भारतीय फलंदाजांवर चांगले नियंत्रण ठेवले. सॅम करन आणि जोफ्रा आर्चर (२/२०) यांच्या अचूक गोलंदाजीमुळे भारताला शेवटच्या दोन षटकांत केवळ आठ धावा करता आल्या.
लंडन: क्रिकेटचे सर्वात प्रतिष्ठित मैदान असलेल्या लॉर्ड्सवर शुक्रवारी पहिला महिला कसोटी सामना खेळला जाणार असून, तिथे इतिहास घडणार आहे. भारतीय आणि ...
टी-२० मधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या (इंग्लंडविरुद्ध भारतीय कर्णधार)
| खेळाडू | धावसंख्या | वर्ष |
| श्रेयस अय्यर | ८०* | २०२६ |
| विराट कोहली | ८०* | २०२१ |
| विराट कोहली | ७७* | २०२१ |
| विराट कोहली | ७३* | २०२१ |
| श्रेयस अय्यर | ६८ | २०२६ |
या खेळीसह अय्यर इंग्लंडविरुद्धच्या द्विपक्षीय टी-२० मालिकेत एकापेक्षा जास्त अर्धशतके झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. इंग्लंडच्या वेगवान माऱ्यासमोर, विशेषतः अतिरिक्त उसळीचा सामना करताना भारतीय आघाडीची फळी अपयशी ठरली असतानाही, अय्यरने दाखवलेले नेतृत्वगुण आणि संयमी फलंदाजी चाहत्यांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे.