Thane News : ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्पासाठी कासारवडवलीत वाहतूक बदल; ६ जुलै ते ५ ऑगस्टपर्यंत मार्ग बंद

ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) महत्त्वाकांक्षी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामासाठी कासारवडवली (Kasarvadavali) परिसरात वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. ठाणे वाहतूक पोलिसांनी ६ जुलैपासून ५ ऑगस्टपर्यंत काही मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. बोगदा प्रकल्पांतर्गत मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (MEIL) कंपनीकडून रस्त्याची पुनर्रचना आणि रॅम्प बांधण्याचे काम सुरू असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. (Ghodbunder Road)



या कालावधीत मुल्ला बाग येथील हिलक्रेस्ट सोसायटी ते नीलकंठ ग्रीन जोडणारा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. या मार्गाऐवजी वाहनचालकांना नीलकंठ वूड्स आणि सत्यशंकर सोसायटीमार्गे पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. तेथून पुढे तात्पुरत्या मार्गाने वाहने पुन्हा मुल्ला बाग रस्त्यावर पोहोचतील.


वाहतूक निर्बंध ६ जुलै रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून लागू होतील आणि ५ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत कायम राहतील. या काळात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे.



मोटार वाहन कायद्याच्या कलम ११५ आणि ११६ अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे. मात्र रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस वाहने, ग्रीन कॉरिडॉरमधील वाहने, ऑक्सिजन वाहतूक करणारी वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवा वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.


दरम्यान, ११.८४ किमी लांबीच्या ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पामुळे भविष्यात ठाणे आणि बोरिवली दरम्यानचा प्रवासाचा वेळ ६० ते ९० मिनिटांवरून सुमारे १५ मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.


वाहतूक पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.


Comments
Add Comment

Pune Airport News : पुणे विमानतळावर मोठी दुर्घटना टळली! धावपट्टीवर विमानाचे इमर्जन्सी ब्रेक

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Pune International Airport) शुक्रवारी (३ जुलै) मोठी दुर्घटना (Major Accident) थोडक्यात टळली. पुणे-जयपूर

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल यांच्या आजोबांचे निधन; नातवाला न्याय मिळावा म्हणून कँडल मार्चमध्ये झाले होते सहभागी

पुणे : केतन अग्रवाल हत्याकांडामुळे (Ketan Agrawal Murder Case) आधीच शोकाकुल असलेल्या अग्रवाल कुटुंबावर आणखी एक दुःखाचा डोंगर

TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले असून या प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

Mahabaleshwar Heavy Rainfall : महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नावली गावातील काही भाग खचला

- प्रशासनाने केले नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर; गावाला कोणताही धोका नाही - नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू

पंढरपुरात मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या भक्तनिवासाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

पंढरपूर : पंढरपूर येथे मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्यावतीने उभारण्यात आलेल्या धर्मशाळा-भक्तनिवासाच्या

Onion Farmers : केंद्र सरकारकडून कांदा उत्पादकांना दिलासा

सरकारी खरेदीदरात १३ टक्क्यांनी वाढ; प्रति क्विंटल २ हजार १२५ रुपये दर निश्चित मुंबई : कांदा उत्पादक