Chhatrapati Sambhajinagar DCC Bank : औरंगाबाद जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा; २० पैकी १८ जागांवर वर्चस्व, भूमिपुत्र बचाव पॅनलचा पराभव

छत्रपती संभाजीनगर : गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेल्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (District Central Cooperative Bank) संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महायुतीने बँकेवर वर्चस्व मिळवले आहे. २० संचालक पदांपैकी १८ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवत बँकेची सत्ता आपल्या ताब्यात घेतली.


सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच महायुतीच्या उमेदवारांना आघाडी मिळत गेली. भाजपचे मंत्री अतुल सावे (Atul Save), शिवसेनेचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार संजना जाधव आणि अनुराधा चव्हाण यांच्यासह अनेक उमेदवार विजयी झाले.



या निवडणुकीत महाविकास आघाडी समर्थित भूमिपुत्र बचाव पॅनलला मोठा धक्का बसला. या पॅनलमधून काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे (Kalyan Kale) हे एकमेव उमेदवार विजयी ठरले. यापूर्वी बिनविरोध निवडून आलेले काँग्रेसचे अनिल बोरसे यांनीही महायुतीला पाठिंबा दिल्याने महायुतीची ताकद आणखी वाढली.


या निवडणुकीत २० पैकी ८ संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. त्यामध्ये ७ उमेदवार महायुतीचे तर एक काँग्रेसचा होता. उर्वरित १२ जागांसाठी ३१ उमेदवार रिंगणात होते. एकूण १०५३ मतदारांपैकी १०४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी जवळपास ९९ टक्के इतकी नोंदवली गेली.



दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी महायुतीच्या पॅनलकडून निवडणूक लढवल्याने या निवडणुकीची राज्यभर चर्चा झाली होती. मतदानापूर्वीच महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये पडलेल्या फुटीचाही महायुतीला फायदा झाल्याचे निकालातून स्पष्ट झाले.


Comments
Add Comment

Devendra Fadnavis : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांच्या निधनावर मुख्यमंत्री फडणवीसांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

नागपूर : विदर्भातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ

Pune Airport News : पुणे विमानतळावर मोठी दुर्घटना टळली! धावपट्टीवर विमानाचे इमर्जन्सी ब्रेक

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Pune International Airport) शुक्रवारी (३ जुलै) मोठी दुर्घटना (Major Accident) थोडक्यात टळली. पुणे-जयपूर

Thane News : ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्पासाठी कासारवडवलीत वाहतूक बदल; ६ जुलै ते ५ ऑगस्टपर्यंत मार्ग बंद

ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) महत्त्वाकांक्षी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल यांच्या आजोबांचे निधन; नातवाला न्याय मिळावा म्हणून कँडल मार्चमध्ये झाले होते सहभागी

पुणे : केतन अग्रवाल हत्याकांडामुळे (Ketan Agrawal Murder Case) आधीच शोकाकुल असलेल्या अग्रवाल कुटुंबावर आणखी एक दुःखाचा डोंगर

TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले असून या प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

Mahabaleshwar Heavy Rainfall : महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नावली गावातील काही भाग खचला

- प्रशासनाने केले नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर; गावाला कोणताही धोका नाही - नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू