Raj thackeray : वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे दाखवून द्या!

राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा ऱ्हास होत असल्याची टीका


मुंबई : "महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि उमद्या राजकीय संस्कृतीची बरोबरी आता उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांशी होऊ लागली आहे. सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री रोज बेताल विधाने करत असून लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसणाऱ्या आपल्या आमदारांवर आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाही. 'आपला माणूस' म्हणून चुका पाठीशी घालण्याच्या या भूमिकेमुळे राज्याची प्रतिमा डागाळत असून, वेडंवाकडं वागणाऱ्यांना देवेंद्र फडणवीस जबर शासन करतात हे आता एकदा कृतीतून दाखवून द्या," असे आवाहन करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.(Raj thackeray )



चेंबूर येथील शाळकरी मुलाचा मृत्यू आणि साकीनाका मॅनहॉल दुर्घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळलेली असतानाच, भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांचा विधिमंडळ परिसरातील एक व्हिडिओ प्रचंड चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये ते गंभीर दुर्घटनांचा संदर्भ देताना हसताना दिसत असल्याचा दावा विरोधकांनी केला असून, त्यावरून भाजपवर असंवेदनशीलतेचे आरोप होत आहेत. यावरून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे.आपल्या ३७ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा दाखला देत राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे की, देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा वेगळा होता. भूतकाळातील ज्येष्ठ नेत्यांनी स्वपक्षाच्या नेत्यांकडून चूक झाली, तरी ती कधी पाठीशी घातली नाही. मात्र, सध्या 'अमर्याद सत्ता माणसाला भ्रष्ट करते', या वाक्याचा प्रत्यय भाजपचे सहकारी आणून देत आहेत. कोणाला कशाचाच खेद किंवा खंत उरलेली नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे."देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आणि संवेदनशील मुख्यमंत्री आहेत, असे संपूर्ण महाराष्ट्राला आणि मलाही वाटत होते. मात्र, अशा गंभीर घटनांवर तुमच्याकडून अवाक्षरही बोलले जात नाही, तेव्हा तुमच्या संवेदनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते. तुमचे नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवत असून त्यांना कोणतीही समज दिली जात नसल्यानेच त्यांची पुन्हा चूक करण्याची हिंमत होते", असा आरोपही त्यांनी केला.(Devendra Fadnavis)



चुकीचे पायंडे पाडू नका, राजीनामे घ्या!


मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या चुकांवर पांघरूण घालणे बंद करावे, असा सल्ला देताना राज ठाकरे यांनी इशारा दिला की, "तुम्ही जर हे थांबवले नाही, तर स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा माणूस इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील. बेफाम वागणाऱ्यांकडून तातडीने राजीनामे घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपली प्रशासकीय पकड आणि वचक पुन्हा सिद्ध करावा", अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

Comments
Add Comment

iPhone 18 Launch Date Out ? : आयफोन १८ सिरीजची उत्सुकता शिगेला! कधी होणार ॲपलचा मोठा इव्हेंट ? वाचा सविस्तर

जगातील अव्वल तंत्रज्ञान कंपनी 'ॲपल' (Apple) आपल्या नव्या उपकरणांसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कंपनी

Martin Day Nithin Chand Guruvayur Wedding : तब्बल १० वर्षांनंतर पूर्ण झाली इच्छा; स्कॉटिश खासदार मार्टिन डे यांनी केरळच्या नितिन चंद यांच्यासोबत मंदिरात केले पारंपरिक लग्न

केरळ : स्कॉटलंडच्या संसद सदस्य (MSP) मार्टिन डे आणि केरळच्या नितिन चंद यांनी प्रसिद्ध गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिरात

Nashik FDA Raid : नाशिकमध्ये एफडीएची मोठी कारवाई, गंगापूर रोडवरील ‘या' हॉटेलचा परवाना निलंबित

Nashik FDA Raid : नाशिकमध्ये एफडीएकडून कारवाईचे सत्र सुरु आहे. खाद्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या, नियमांचे उल्लंघन

Prince Harry Meghan Markle UK Return : सहा वर्षांचा ‘वनवास’ संपणार? प्रिन्स हॅरी आणि मेगन ब्रिटनमध्ये परतण्याच्या तयारीत; मुलं शाही कुटुंबाच्या जवळ जाणार

लंडन : ब्रिटिश शाही कुटुंबापासून दूर झाल्यानंतर तब्बल सहा वर्षांनी प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्कल

Cancer Vaccine : कॅन्सरवरील उपचारात मोठा चमत्कार! मॉडर्ना आणि मर्कची नवीन लस लवकरच बाजारात येण्याची शक्यता

कर्करोगाची गाठ पुन्हा न होण्यासाठी वैयक्तिककृत 'mRNA' लस ठरतेय प्रभावी; अंतिम चाचणीत मोठे यश कॅन्सर (कर्करोग) या

Jalgaon Crime : एकाकडे बंदूक, एकाकडे सूरी...पोलिसाच्याच घरावर दरोडा; पोलिसाने स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतलं अन्....

Jalgaon Crime : जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरावरच दोन अज्ञात