Yogesh Kadam : भाषणे ठोकून मते मिळत नाहीत, जनतेत उतरावे लागते; मंत्री योगेश कदमांचा राज ठाकरेंना थेट टोला!

- सोशल मीडियावरील विकृत प्रवृत्तींना चाप बसणार, महायुती सरकार लवकरच नवा कायदा आणण्याच्या तयारीत


मुंबई : केवळ व्यासपीठावरून मोठी भाषणे ठोकून मते मिळत नाहीत, तर त्यासाठी प्रत्यक्ष जनतेमध्ये उतरून काम करावे लागते. महायुती सरकार म्हणून आम्ही सातत्याने जनतेच्या हिताचे काम करत आहोत आणि म्हणूनच लोकसभा, विधानसभाच नव्हे तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही जनता आमच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे," असा थेट आणि अत्यंत मोजका टोला मंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे. राजकारणात कोणाचा फायदा करायचा आणि कोणाचा तोटा, हे ठरवण्याचा अधिकार फक्त जनतेलाच असतो, असे सांगत त्यांनी महायुती सरकारच्या कामाची पावती जनतेच्या दरबारात मिळत असल्याचा विश्वास व्यक्त केला. (Yogesh Kadam)


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकप्रतिनिधींची तुलना 'देहविक्री' करणाऱ्यांशी केल्याबद्दल मंत्री योगेश कदम यांनी अत्यंत तीव्र आक्षेप घेतला. लोकशाहीत जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींबद्दल अशा हीन शब्दांत तुलना करणे अत्यंत अयोग्य आणि निंदनीय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच मुद्द्यावरून राज ठाकरेंना भूतकाळाची आठवण करून देत कदम (Yogesh Kadam) यांनी एक खोचक सवाल उपस्थित केला. ते म्हणाले की, "जेव्हा उद्धव ठाकरे यांनी मनसेचे ६ नगरसेवक फोडून आपल्या पक्षात घेतले होते, तेव्हा राज ठाकरे यांचे या 'देहविक्री'च्या व्याख्येवर काय मत होते? हे त्यांनी एकदा जनतेसमोर स्पष्ट करावे." या विधानातून त्यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेतील दुटप्पीपणावर थेट निशाणा साधला. (Yogesh Kadam)



दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या आत्मचिंतनाच्या सल्ल्याला उत्तर देताना मंत्री कदम (Yogesh Kadam) यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील त्रुटींवर बोट ठेवले. शिवसेनेत आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना अंधारात ठेवून जेव्हा उद्धव ठाकरे यांची नेते म्हणून निवड करण्यात आली, तेव्हाच खऱ्या अर्थाने विचार आणि आत्मचिंतन व्हायला हवे होते, असा घणाघात त्यांनी केला. उद्धव ठाकरे नेते झाल्यानंतर त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळूनच नारायण राणे, राज ठाकरे यांसारख्या मोठ्या नेत्यांनी पक्ष सोडला आणि शेवटी पक्ष वाचवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऐतिहासिक उठाव करावा लागला. त्यामुळे संजय राऊत यांनी महायुती किंवा इतर पक्षांचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या शिल्लक राहिलेल्या पक्षाचे आत्मचिंतन करावे, असा सणसणीत सल्लाही त्यांनी दिला. (Yogesh Kadam)



माध्यमांशी बोलताना मंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंग आणि वैयक्तिक टार्गेट करण्याच्या विकृत प्रवृत्तीवर राज्य सरकार गंभीर असल्याचे सांगितले. सध्या सोशल मीडियावरील कमेंट्समध्ये अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना शिवीगाळ केली जाते, ठराविक अजेंडा राबवून लोकांना टार्गेट केले जाते. या प्रवृत्तीला वेळीच आळा घालण्यासाठी आणि डिजिटल माध्यमांमध्ये सुसंस्कृतपणा राखण्यासाठी महायुती सरकार लवकरच एक अत्यंत कडक कायदा आणण्याच्या विचारात असल्याची महत्त्वाची माहिती त्यांनी दिली. सरकारच्या या निर्णयामुळे अशा विकृत प्रवृत्तींना चाप बसेल, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला. (Yogesh Kadam)

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : शेतकऱ्यांना रॉयल्टीतून 'मुक्ती'! शेतघर, विहीर, गोठ्यासाठी माती-मुरूम वापरल्यास दंडात्मक कारवाई नाही

मुंबई : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती सुधारण्यासाठी, तसेच स्वतःचे शेतघर, विहीर आणि जनावरांचा गोठा यांसारख्या

FIFA WORLDCUP 2026 : 'रेड कार्ड'मुळे डॉमिनोज चे ९.५ कोटींचे फ्री पिझ्झा वाटप!

फिफा वर्ल्ड कप २०२६ सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, या स्पर्धेतील केवळ खेळाचा थरारच नाही, तर एका

Pankaj Bhoyar : कस्तुरबा गांधी विद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सामावून घेण्याबाबत सरकार सकारात्मक लवकरच मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडणार

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पालघर जिल्ह्यातील कस्तुरबा गांधी निवासी

Gold Silver Rate Today : सोने घ्यायचं की थांबायचं? पुन्हा बदलले दर; चांदीनेही गाठला विक्रमी टप्पा, जाणून घ्या आजचे भाव

Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा बदल झाला असून, ग्राहक आणि गुंतवणूकदारांचे लक्ष आजच्या ताज्या

Prakash Abitkar : राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे 'ऑडिट' होणार?

आरोग्यमंत्री सकारात्मक; टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेससारख्या संस्थांची निवड होणार मुंबई : राज्यातील

Horrific bus accident : रत्नागिरीत दोन बसेसची समोरासमोर धडक; १५ विद्यार्थी जखमी

रत्नागिरी: रत्नागिरीतील मिरजोळे-उक्षी मार्गावर गुरुवारी सकाळी दोन बसेसची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची