Yogesh Kadam : मुंबई लोकलच्या महिला डब्यात आता रात्री ९ ते सकाळी ८ पर्यंत पोलीस

गर्दुल्ल्यांचा उपद्रव आणि ड्रग्सबाबत २५ दिवसांत निर्णय - गृहराज्यमंत्री योगेश कदम


मुंबई : महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आता लोकलच्या महिला डब्यांमध्ये रात्री ९ ते सकाळी ८ वाजेपर्यंत पोलीस-गार्ड तैनात ठेवण्यात येणार आहेत. अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केली. आज विधान परिषदेत आमदार रवींद्र फाटक यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे मुंबई लोकल मधील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुख्य मुद्दा उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम(Yogesh Kadam) यांनी सांगितलं की, यापूर्वी ही सुरक्षा केवळ सकाळी ६ वाजेपर्यंतच असायची, मात्र आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत शासनाने ही वेळ आता २ तासांनी वाढवली आहे.


गर्दुल्ल्यांचा उपद्रव आणि अमली पदार्थांविरोधात कडक पावले


रेल्वे स्थानक आणि परिसरात वाढणाऱ्या गर्दुल्ल्यांच्या उपद्रवावर आणि ड्रग्जच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने निश्चित कालमर्यादा आखली आहे. रेल्वे पोलिसांच्या आयुक्तांसोबत येत्या १५ दिवसांत एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार असून, स्थानक परिसरात ड्रग्ज पुरवठा नक्की कुठून होतो याचा शोध घेतला जाईल. तसेच, पुढील २५ दिवसांत अशा संशयित आणि उपद्रवी घटकांचा पूर्वेतिहास (record) तपासून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले आहेत.


वाढती प्रवासी संख्या आणि रेल्वे अपघातांवर उपाययोजना


मुंबई उपनगरीय लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी असून यातून दररोज सुमारे ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करतात. वाढत्या गर्दीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी सरकारकडून गांभीर्याने प्रयत्न सुरू आहेत. अपघात कमी करण्याच्या उद्देशाने लोकल फेऱ्यांची संख्या वाढवणे आणि जास्तीत जास्त लोकल १५ डब्यांच्या करण्याबाबत रेल्वे प्रशासनासोबत सकारात्मक पावले उचलली जात आहेत.




  • प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सध्या सुरू असलेल्या उपाययोजना

  • कार्यक्षेत्रातील एकूण १७७ रेल्वे स्थानकांवर सध्या ६,८९९ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत.

  • रेल्वे पोलिसांच्या मदतीसाठी शासनाने २००० होमगार्ड आणि १५० एमएसएफ (MSF) जवानांना मंजुरी दिली आहे. त्यापैकी सध्या १५२० होमगार्ड आणि ११२ एमएसएफ जवान प्रत्यक्ष सेवेत तैनात आहेत.

  • रेल्वे स्थानकांवर प्रत्यक्ष गस्त (व्हिसिबल पोलिसिंग) वाढवण्यात आली आहे. संशयित व्यक्तींची ओळख तत्परतेने पटवण्यासाठी 'फेसिअल रेकगनिशन सिस्टीम' (चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान) सारख्या आधुनिक साधनांचा वापर केला जात आहे.

  • प्रत्येक रेल्वे स्थानकावर संशयित बॅगांची तपासणी केली जाते, तर मुख्य टर्मिनसच्या ठिकाणी स्कॅनरद्वारे बॅगा तपासल्या जातात.

  • प्रवाशांच्या तातडीच्या मदतीसाठी १५१२ ही हेल्पलाईन २४ तास कार्यरत आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींचे निवारण करून प्रवाशांना त्यांचे गहाळ झालेले कोट्यवधी रुपये आणि सामान परत मिळवून देण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे.

Comments
Add Comment

Dattatray Bharne : महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर

विशेष सवलतींची तरतूद; शेतमजूर, निराधार महिलांना मिळणार शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मुंबई : राज्यातील

Devendra Fadnavis : माहिती अधिकार कायद्यांमधील बदलांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

राज्य माहिती आयोगाला पत्र; अण्णा हजारेंनी दिला होता उपोषणाचा इशारा मुंबई : माहिती अधिकार (

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-३ मार्ग

सार्वजनिक वाहतूक दिवसानिमित्त अ‍ॅक्वा लाईनच्या प्रवाशांसाठी बीकेसी मध्ये मोफत फीडर बस सेवा मुंबई: मुंबई

Asha Bhosle : राज्यात स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार - आशिष शेलार

मुंबई : महाराष्ट्रातील गायन-संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम

Girish Mahajan : 'गरज असेल तरच घराबाहेर पडा!' मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांचे नागरिकांना मोठे आवाहन

मुंबई : राज्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागांत पाऊस सुरू आहे. विशेषतः मुंबईत

ST NCMC Card : एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डला प्रवाशांचा जबरदस्त प्रतिसाद; ६२.८६ लाखांनी केली नोंदणी

- १ ऑगस्टपासून मोठा बदल मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC)