नवी दिल्ली : भारतीय नौदलाने पुन्हा एकदा समुद्रातील आपली ताकद सिद्ध करत मोठ्या समुद्री चाचेगिरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. मंगळवारी रात्री एडनच्या आखातात भारतीय युद्धनौका आयएनएस त्रिकंडने तत्परता आणि चातुर्य दाखवत एका मालवाहू जहाजाची समुद्री चाच्यांच्या तावडीतून यशस्वीरित्या सुटका केली.
राज्य माहिती आयोगाला पत्र; अण्णा हजारेंनी दिला होता उपोषणाचा इशारा मुंबई : माहिती अधिकार (RTI) कायद्यामध्ये बदल ...
सूत्रांच्या माहितीनुसार, समुद्री चाच्यांनी ज्या जहाजावर हल्ला केला होता, त्या मालवाहू जहाजाचे नाव एमव्ही गोल्डन आर्सेनल आहे. या व्यावसायिक जहाजावर भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आवश्यक माल (कार्गो) होता. विशेष म्हणजे, या जहाजाच्या चालक दलात एक भारतीय नागरिकही कार्यरत होता.माहितीनुसार, हल्ला होताच जहाजाच्या चालक दलाने प्रसंगावधान राखले. समुद्री चाच्यांनी जहाजाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करताच चालक दलातील सदस्यांनी स्वतःला जहाजातील सुरक्षित कक्षात बंद करून घेतले. त्यानंतर त्यांनी रेडिओ संप्रेषण प्रणालीद्वारे भारतीय नौदलाशी संपर्क साधून हल्ल्याची माहिती दिली आणि तातडीने मदतीची विनंती केली.
मुंबई : आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या १ हजार ४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये इतके अनुदान वितरित करण्यास ...
संकटाचा संदेश मिळताच जवळच तैनात असलेली आयएनएस त्रिकंड ही भारतीय युद्धनौका तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाली. भारतीय युद्धनौका आपल्या दिशेने येत असल्याचे पाहताच आणि भारतीय नौदलाच्या धाकामुळे समुद्री चाच्यांनी तेथून पळ काढला.चाचे पळून गेल्यानंतर भारतीय नौदलाच्या मार्कोस (मरीन कमांडो) पथकाने जहाजावर उतरून संपूर्ण जहाजाची कसून तपासणी केली. जहाजावर कोणताही समुद्री चाचा लपलेला नाही किंवा कोणताही धोका शिल्लक नाही, याची त्यांनी खात्री करून घेतली.