मुंबई : मुंबईत रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता वाहतुकीलाही बसू लागला आहे. पश्चिम उपनगरात पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. (Mumbai Rains Traffic)
सर्वाधिक परिणाम पश्चिम द्रुतगती महामार्गावर (Western Express Highway) दिसून येत आहे. बोरिवलीहून वांद्र्याकडे जाणाऱ्या मार्गावर मालाड ते सांताक्रुझदरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. नेहमी अवघ्या ३० मिनिटांत पूर्ण होणारा प्रवास आता तब्बल दीड तासांहून अधिक वेळ घेत आहे, त्यामुळे कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. (Mumbai Rains Traffic)
नवी दिल्ली : देशातील वाहनचालकांना अखेर दिलासादायक बातमी मिळाली आहे. मध्यपूर्वेतील तणाव कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ...
मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले आणि सांताक्रुझ या परिसरात महामार्गावर वाहनांची संथ गती कायम असून, चारचाकी, बस आणि मालवाहू वाहनांच्या रांगा अनेक किलोमीटरपर्यंत पसरल्याचे चित्र आहे. दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. प्रमुख चौकांवर अतिरिक्त पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले असून, वाहनांची कोंडी कमी करण्यासाठी वाहतुकीचे नियोजन करण्यात येत आहे. (Mumbai Rains Traffic)
पश्चिम उपनगरात काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. वांद्रे, सांताक्रुझ, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि बोरिवली परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून, पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास सखल भागांमध्ये पुन्हा पाणी साचण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (Mumbai Rains Traffic)
नवी दिल्ली : आज, १ जुलै २०२६ पासून देशभरात अनेक महत्त्वाचे नियम लागू झाले आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर, खर्चावर आणि ...