SIR in Mumbai : 'मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक'

मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम अंतर्गत मुंबईत कार्यवाही सुरू आहे. या अनुषंगाने राबविण्यात येत असलेल्या विविध प्रक्रियांमध्ये राजकीय पक्षांनी सहकार्य करावे. तसेच, ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीदरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) गृहभेटीदरम्यान अधिकाधिक गणना होण्याच्या दृष्टिने सहाय्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले आहे.





मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम संदर्भात माहिती देण्याच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या अध्यक्षतेखाली विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मंगळवारी ३० जून २०२६रोजी पार पडली. त्यावेळी भिडे बोलत होत्या.



उपमहापौर संजय घाडी, अतिरिक्त आयुक्त (शहर) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी प्राजक्ता वर्मा-लवंगारे, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी (मुंबई शहर जिल्हा) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी आंचल गोयल, सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार आदी यावेळी उपस्थित होते. तसेच, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.



जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे पुढे म्हणाल्या की, ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीदरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) गृहभेटी देणार आहेत. मतदारांनी संबंधित बीएलओ यांना आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. कोणताही पात्र मतदार वंचित राहू नये आणि कोणतीही अपात्र व्यक्ती समाविष्ट होऊ नये, हा या संपूर्ण प्रक्रियेचा उद्देश आहे. त्यामुळे, या प्रक्रियेसाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन भिडे यांनी केले आहे.



मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन -) कार्यक्रम अंतर्गत सुरू असलेली प्रक्रिया, वेळापत्रक आणि कार्यवाहीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या विविध मुद्द्यांवर चर्चाही करण्यात आली.

Comments
Add Comment

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक

Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता मुंबई : महसूल

MIDC Maharashtra : वैभववाडी 'MIDC'ला मूर्त रूप, पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री उदय सामंतांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक मुंबई :

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील आठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,