'उबाठा'ला पुन्हा मोठा धक्का; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी खेळी
मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. उबाठा गटाचे खंदे शिलेदार आणि उपनेते सचिन अहिर यांनी शिवसेनेकडून (Shinde) विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. १ जुलै रोजी होणाऱ्या या निवडणुकीच्या अवघ्या २४ तास आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मोठी राजकीय खेळी खेळल्याने उबाठा गटाला मुंबईत आणखी एक जबरदस्त धक्का बसला आहे.
Nashik Mhada Housing Scams : नाशिकमधील म्हाडा गृहनिर्माण घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून या प्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. गरीबांसाठी राखीव ...
माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत १३ मे २०२६ रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या रिक्त पदासाठी बुधवार, १ जुलै रोजी निवडणूक पार पडणार असल्याची अधिकृत घोषणा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सोमवारी सभागृहात केली होती. या घोषणेनंतर महायुतीमध्ये या प्रतिष्ठेच्या पदासाठी जोरदार हालचाली सुरू होत्या.विधान परिषद नियमानुसार, या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम मुदत मंगळवार, ३० जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत होती. या मुदतीपूर्वी नाट्यमय घडामोडी घडत सचिन अहिर यांनी शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी आपला अर्ज विधानमंडळ सचिवालयाचे सचिव डॉ. विलास आठवले यांच्याकडे सादर केला. मुंबईत आधीच खिळखिळ्या झालेल्या उबाठा गटाला यामुळे मोठा धक्का बसला आहे.
निवडणूक बिनविरोध होणार?
महायुतीमधील सत्ता वाटपाच्या सूत्रानुसार विधान परिषदेच्या उपसभापती पदावर शिवसेनेचा दावा निश्चित होता. या पदासाठी माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा प्रबळ दावा मानला जात होता आणि पक्षांतर्गत मोठी रस्सीखेच सुरू होती. मात्र, शेवटच्या क्षणी सचिन अहिर यांनी अर्ज भरल्याने पक्षांतर्गत समीकरणांना पूर्णपणे नवे वळण मिळाले आहे.सध्या विधान परिषदेत सत्ताधारी महायुतीकडे ५६ आमदारांचे भक्कम संख्याबळ असून, काही अपक्ष आमदारांचाही त्यांना पाठिंबा आहे. महायुतीचे पारडे प्रचंड जड असल्याने आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर उबाठा गटाचा मोहरा फुटल्याने विरोधी पक्षांकडून (महाविकास आघाडी) या निवडणुकीत उमेदवार उभा केला जाण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.