Ford Employees : नारळ दिलेल्या कर्मचाऱ्यांनाच पुन्हा बोलावण्याची फोर्डवर वेळ, एआयचा प्रयोग ठरला अपुरा

नवी दिल्ली : विविध उद्योगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर झपाट्याने वाढत असून अनेक कंपन्या मनुष्यबळाऐवजी (Ford Employees) एआयच्या मदतीने कामकाज अधिक वेगवान आणि कमी खर्चात करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, एआयच्या मर्यादा अद्याप कायम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अमेरिकेतील वाहन उत्पादक कंपनी फोर्डला याचा फटका बसला असून, उत्पादन प्रक्रियेत आलेल्या अडचणींमुळे कंपनीला कामावरून कमी केलेल्या अनुभवी अभियंत्यांनाच पुन्हा सन्मानाने कामावर बोलवावे लागले आहे.



ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, काही महिन्यांपूर्वी फोर्डने उत्पादन प्रक्रियेत एआयचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याचा निर्णय घेतला होता. एआयच्या मदतीने उत्पादन अधिक अचूक होईल, खर्चात कपात होईल आणि कामाचा वेग वाढेल, असा कंपनीचा अंदाज होता. या धोरणाचा भाग म्हणून शेकडो कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत एआय अपेक्षेप्रमाणे प्रभावी ठरला नाही. वाहनांच्या उत्पादनादरम्यान निर्माण होणाऱ्या दर्जासंबंधी त्रुटी ओळखणे आणि त्यांचे प्रभावी निराकरण करण्यात एआयला मर्यादा आल्या. परिणामी उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ लागला.



ही परिस्थिती लक्षात घेत फोर्डने पुन्हा अनुभवी मनुष्यबळाची मदत घेण्याचा निर्णय घेतला. कंपनीने ३५० हून अधिक अनुभवी अभियंत्यांना पुन्हा कामावर घेतले असून, त्यापैकी अनेक कर्मचारी यापूर्वी याच कंपनीत कार्यरत होते आणि त्यांनाच आधी सेवामुक्त करण्यात आले होते. या घडामोडीनंतर सोशल मीडियावर या निर्णयाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. एआय कितीही प्रगत झाले, तरी प्रत्यक्ष अनुभव, समस्या सोडवण्याची क्षमता आणि निर्णयक्षमता यांसारख्या मानवी कौशल्यांची जागा तंत्रज्ञान पूर्णपणे घेऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. फोर्डच्या या अनुभवामुळे एआय आणि मानवी कौशल्य यांचा समतोल राखण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Comments
Add Comment

Ghatkopar : घाटकोपर परिसरातील पदपथांवरील ४ अनधिकृत दुकाने आणि ३ वाचनालयांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर परिसरातील संत ज्ञानेश्वर मार्ग, पंतनगर येथील पदपथांवर अडथळा निर्माण करणाऱ्या ४

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या

India in Venezuela : व्हेनेझुएलामधील भारताची मदत मोहीम अधिक तीव्र; चोवीस तास मोफत वैद्यकीय सेवा सुरू

व्हेनेझुएला : ऑपरेशन ‘अमिस्ताद’ (Amistad)अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलामध्ये तैनात भारतीय लष्कराचे फील्ड

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

India Women's Cricket Team : आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या महिला क्रिकेट संघाची घोषणा, हरमन कर्णधार

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) महिला निवड समितीने सप्टेंबर २०२६ मध्ये जपानमधील ऐची-नागोया येथे