IND vs AUS : ऑस्ट्रेलियाकडून पराभवानंतर भारताचं टी-20 वर्ल्डकपमधील आव्हान संपलं; 'या' चुका ठरल्या निर्णायक

आयसीसी (ICC) महिला टी-20 (T20) वर्ल्डकपमध्ये (World Cup) ऑस्ट्रेलियाने (Australia) भारताचा ६ विकेट्सनी पराभव करत स्पर्धेतील भारताचं आव्हान संपुष्टात आणलं. या विजयासह ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांनी सेमीफायनलमध्ये (Semi-final) प्रवेश केला. मात्र, भारताच्या बाहेर पडण्यामागे केवळ ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव नव्हे, तर सहा दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या महत्त्वाच्या चुका देखील कारणीभूत ठरल्या. भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत १७० धावा उभारल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने ५६ धावा केल्या, तर स्मृती मंधानाने ३८, शेफाली वर्माने ३४ आणि जेमिमा रॉड्रिग्सने ३४ धावांचे योगदान दिले.


१७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. रेणुका सिंहने जॉर्जिया वॉलला अवघ्या ४ धावांवर बाद केले. त्यानंतर श्री चरणीने फोबी लीचफिल्डला २४ धावांवर आणि बेथ मुनीला २२ धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद ६८ अशी केली. त्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा बळावल्या होत्या.



मात्र, एलिस पेरी आणि अॅशले गार्डनर यांनी चौथ्या विकेटसाठी जवळपास १०० धावांची भागीदारी (Partnership) करत सामना भारताच्या हातातून हिसकावून घेतला. पेरीने ५६ धावा केल्या, तर गार्डनर ५३ धावांवर नाबाद राहिली. अखेरीस ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्स राखून विजय मिळवला.



दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चुका ठरल्या महाग


भारताच्या स्पर्धेतील बाहेर पडण्यामागे दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभवही तितकाच महत्त्वाचा ठरला. त्या सामन्यात भारताने दिलेल्या १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मॅरिझान कॅपने ८१ धावांची नाबाद खेळी करत दक्षिण आफ्रिकेला ६ विकेट्सनी विजय मिळवून दिला.


या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी (Fielders) मॅरिझान कॅपचे तब्बल तीन झेल (Catch) सोडले. १०व्या, १३व्या आणि १७व्या षटकात मिळालेल्या संधी भारताला साधता आल्या नाहीत. या तीनपैकी एक जरी झेल पकडला गेला असता, तर सामन्याचा निकाल बदलू शकला असता.


याच पराभवामुळे भारताला गुणतालिकेत (Points Table) मोठा फटका बसला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली लढत देऊनही सेमीफायनलचे (Semi-final) तिकीट मिळवता आले नाही. त्यामुळे सहा दिवसांपूर्वी झालेल्या क्षेत्ररक्षणातील (Fielding) चुका अखेर भारताच्या टी-20 (T20) वर्ल्डकप (World Cup) मोहिमेसाठी निर्णायक ठरल्या.

Comments
Add Comment

Team India Zimbhave Tour : भारताचा युके दौरा संपला;आता झिम्बाब्वेविरुद्धचे पुढचे सामने कधी ?

मुंबई : इंग्लंड दौऱ्यात निराशाजनक कामगिरीनंतर भारतासमोर आता झिम्बाब्वेविरुद्ध पुनरागमन करण्याची संधी आहे.

PV Sindhu : चायना ओपनमध्ये पीव्ही सिंधूकडे भारताचे नेतृत्व; सात्विक आणि चिरागची दुखापतीमुळे माघार

नवी दिल्ली : जपान ओपन सुपर ७५० विजेतेपद जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेली भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही

Mansukh Mandaviya : भारतात १५ जुलैपर्यंत डोपिंगची ७८ प्रकरणे; केंद्रीय क्रीडा मंत्री मांडवियांची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : देशातील क्रीडा क्षेत्राशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. केंद्रीय

FIFA WORLDCUP 2026 : स्पेनकडून पराभवानंतर अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक भावुक! पत्रकार परिषदेत दाटला कंठ, अश्रू अनावर होताच...

न्यू जर्सी : फिफा विश्वचषकातील सर्वात चर्चित सामन्यांपैकी एक ठरलेल्या स्पेनविरुद्धच्या पराभवानंतर

Rohit Sharma : 'निवृत्तीच्या चर्चा सुरु राहिल्या नाहीत तर...' हिटमॅनने एकदिवसीय क्रिकेटमधील भविष्याबाबत सोडले मौन! VIDEO चर्चेत

टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत सध्या क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.

FIFA WORLDCUP 2026 : स्पेनचा ऐतिहासिक विजय आणि एका नव्या युगाचा उदय!

फुटबॉल इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा महासंग्राम मानला गेलेला फिफा विश्वचषक २०२६ अत्यंत रोमांचक वातावरणात