DCM Eknath Shinde : 'महाराष्ट्रात गुन्हेगारांना अभय नाही'; नसरापूर प्रकरणाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडक इशारा

- महिला व बालिकांवरील अत्याचारांबाबत सरकारची शून्य सहनशीलतेची भूमिका


मुंबई : नसरापूर बालिका बलात्कार आणि हत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी या निर्णयाचे स्वागत करत महाराष्ट्रात कायद्याचे राज्य असून गुन्हेगारांना कोणतेही अभय मिळणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिला. विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा निर्णय न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणारा असल्याचे सांगितले.


उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले की, न्यायालयाच्या या निकालामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे. महिलांवर आणि बालिकांवर अत्याचार करणाऱ्यांसाठी हा कठोर आणि स्पष्ट संदेश असून, अशा घृणास्पद गुन्ह्यांना महाराष्ट्रात कोणतीही माफी नाही.



"अशा नराधमांना समाजात किंवा कायद्याच्या राज्यात स्थान नाही. महिलांवर, मुलींवर आणि लहान बालिकांवर अत्याचार करणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत राहून कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच हवी," असेही शिंदे यांनी ठामपणे सांगितले. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. प्रत्येक महिला आणि मुलगी सुरक्षित वातावरणात जगू शकेल, यासाठी सरकार सातत्याने प्रभावी उपाययोजना राबवत आहे. (DCM Eknath Shinde)


गुन्ह्यांचा जलद तपास, फास्ट ट्रॅक न्यायालयांमार्फत खटल्यांचा वेगाने निपटारा आणि दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. (DCM Eknath Shinde)



नसरापूर प्रकरणातील न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यात कायद्याचा धाक कायम असल्याचा संदेश गेला असून, महिलांविरोधातील गुन्ह्यांबाबत सरकारची 'शून्य सहनशीलता' धोरण कायम राहील, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. (DCM Eknath Shinde)




Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून