विनाशकारी भूकंपाच्या तडाख्यातून अद्याप सावरत नसलेल्या व्हेनेझुएलाला शनिवारी (२७ जून) पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. राजधानी काराकासपासून सुमारे ७० किलोमीटर पश्चिमेला ४.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. सुदैवाने या नव्या धक्क्यामुळे कोणत्याही मोठ्या नुकसानाची किंवा जीवितहानीची तत्काळ नोंद झालेली नाही. मात्र, आधीच उद्ध्वस्त झालेल्या भागांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (Venezuela Earthquake)
बुधवारी व्हेनेझुएलामध्ये ७.२ आणि ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे दोन भीषण भूकंप झाले होते. या दुहेरी धक्क्यांमुळे देशातील अनेक इमारती कोसळल्या, रस्ते आणि पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या. आतापर्यंत या दुर्घटनेत १,४३० जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली असून, सुमारे ५१ हजार नागरिक बेपत्ता असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. (Venezuela Earthquake)
भिवंडी : भिवंडी शहरातील मुंबई-नाशिक महामार्गावरील निम्बोळी परिसरात रविवारी (२८ जून) टायर आणि लाकडी पॅलेटच्या गोदामाला भीषण आग लागल्याने परिसरात एकच ...
बचाव पथके गेल्या काही दिवसांपासून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. मात्र, भूकंपानंतर वारंवार होत असलेल्या आफ्टरशॉक्समुळे बचावकार्य अधिक धोकादायक आणि आव्हानात्मक बनले आहे. तज्ज्ञांच्या मते, भूकंपानंतरचे पहिले ७२ तास जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांची वेळेशी स्पर्धा सुरू आहे. अनेक नागरिक अद्यापही कोसळलेल्या इमारतींच्या अवशेषाखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Venezuela Earthquake)
बुधवारी झालेल्या भूकंपाचा सर्वाधिक फटका ला ग्वायरा राज्याला बसला असून, राजधानी काराकासमधील अनेक वस्त्यांमध्येही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, सरकारच्या मदत आणि पुनर्वसन कार्यात नियोजनाचा अभाव असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. अनेक भागांमध्ये मोबाईल आणि इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे मदतकार्य आणि संपर्क व्यवस्थेवरही गंभीर परिणाम झाला आहे. (Venezuela Earthquake)
पुणे : किल्ले राजगड (Rajgad Fort) येथे पर्यटनासाठी (Tourism) निघालेल्या मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांच्या मिनी बसचा (Mini Bus) पुणे जिल्ह्यातील पाबे घाटात (Pabe Ghat) भीषण ...
नव्या भूकंपाच्या धक्क्यानंतर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, आफ्टरशॉक्सचा धोका अद्याप कायम असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.






