उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका सामन्या कुटुंबातील महाविद्यालयीन विद्यार्थीनीला आयकर विभागाने २० कोटी रूपयांची नोटीस बजावली आहे. हा व्यवहार विद्यार्थीनीच्या बँक खात्यातून झाल्याचे सांगीतले जात आहे. ज्यावेळी एवढ्या मोठ्या रकमेची नोटीस आली , तेव्हा विद्यार्थिनीसह तिच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीन हादरली.
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावर बनावट सोन्याची बिस्किटं विक्री सुरू ...
गरीब बापाची पोरगीवर २० कोटीचा नोटीस !
उन्नावमधील गिरिजाबाग परिसरात राहणारी रश्मि सविता ही सध्या महाविद्यालयीन विद्यार्थीनी असून ती पदवीचं शिक्षण घेत आहे. रश्मिचे वडील अजय शंकर हे मजदूर म्हणून इमरातीच्या बांधकामा मध्ये काम करताता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या या कुटुंबाला जेव्हा आयकर विभागाची नोटीस मिळाली, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. रश्मिच्या विरोधात आयकर विभागाने आयकर कायद्याच्या कलम १३१ च्या अंतर्गत नोटीस जारी केली आहे.
Jalgaon : पावसाळा सुरू होताच पर्यटनप्रेमींचा मोर्चा गोव्याकडे वळला असून, जळगावहून गोव्यासाठी सुरू असलेल्या विमानसेवेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. ...
रश्मिच्या नवावर कंपनी ?
मिळालेल्या माहितीनुसार, रश्मिच्या (Rashmi) नावावर दिल्लीतील बुराडी परिसरात 'आरएस एंटरप्राइजेज' (RS Enterprises) नावाची एक कंपनी सुरू असल्याचे समोर आले आहे. रश्मिने दावा केला आहे की, कोणी तरी अज्ञात फसवणूक करणाऱ्या टोळीने तिच्या नकळत तिचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड वापरून बनावट कंपनी स्थापन केली आहे. याच कंपनीच्या नावावर हा व्यवहार झाल्याचे सांगीतले जात आहे.
Nashik : देशात स्वच्छ आणि परवडणाऱ्या ऊर्जेला चालना देणाऱ्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’ची (Pradhan Mantri Surya Ghar Free Electricity Scheme) माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत ...
या बनावट कंपनीची स्थापना २०२५ साली झाली. अवघ्या काही महिन्यांतच म्हणजे ९ मे २०२५ रोजी ही कंपनी बंदही करण्यात आली होती.या काही महिन्यांच्या कालावधीत कंपनीच्या माध्यमातून तब्बल २०.९८ कोटी रुपयांची (Worth ₹20.98 crore) उलाढाल आणि व्यावसायिक व्यवहार करण्यात आले. त्यामुळे आयकर विभागाने रश्मिला नोटीस पाठवून जाब विचारला. रश्मिने स्पष्ट केलं आहे की, या कंपनीशी आणि या व्यवहाराशी तिचा काहीही संबंध नाही आहे. याशिवाय तिने आपले शासकिय कागदपत्रांचा इतक्या मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्यामुळे तिने सार्वजनिक तक्रार निवारण पोर्टलवर आपली तक्रार नोंदवली आहे. तसेच, या संपूर्ण फसवणुकीची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, यासाठी तिने स्थानिक पोलीसांकडेही लेखी अर्ज दिला आहे. आता हे ट्रान्झेक्शन्स कुणी केले? याचा तपास आयकर विभागाकडून केला जात आहे.