Mumbai News : मुंबईतील जुन्या भागांचे रूप पालटणार

म्हाडाचे ९२५ एकरांवर ११ महत्त्वाकांक्षी प्रकल्प, ४ लाख कोटींची होणार गुंतवणूक



मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील शहरातील (Mumbai) जुन्या आणि जीर्ण झालेल्या म्हाडा वसाहतींच्या (MHADA) पुनर्विकासासाठी म्हाडाने हाती घेतलेल्या ९२५ एकर क्षेत्रावरील ११ महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे तब्बल ४ लाख कोटींची गुंतवणूक आकर्षित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकल्पांमुळे हजारो कुटुंबांना आधुनिक घरे मिळणार असून मुंबईच्या पायाभूत सुविधांनाही नवे बळ मिळणार आहे.
म्हाडाच्या ‘कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी' (सीअँडडीए) मॉडेलअंतर्गत हे प्रकल्प राबवले जात आहेत. या माध्यमातून मुंबईतील अनेक दशकांपूर्वी उभारलेल्या वसाहतींचे रूपांतर अत्याधुनिक टाउनशिपमध्ये केले जाणार आहे. वांद्रे रिक्लेमेशन, वरळीतील आदर्श नगर, अंधेरीतील एस.व्ही.पी.नगर, गोरेगावमधील मोतीलाल नगर, कांदिवली, बोरिवली आणि खार परिसरातील वसाहतींसह अनेक महत्त्वाच्या भागांचा या योजनेत समावेश आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील या प्रकल्पांमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी चैतन्याची लाट निर्माण झाली आहे.




या पुनर्विकास मोहिमेअंतर्गत सुमारे ७५ हजार पुनर्वसन घरे उभारली जाणार असून त्यासोबतच ३० हजारांहून अधिक नवीन घरे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. आधुनिक वास्तुरचना, प्रशस्त रस्ते, हरित क्षेत्रे, पार्किंग सुविधा, समाजमंदिरे, आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा यांचा समावेश असलेल्या या टाउनशिप नागरिकांच्या जीवनमानात मोठी सुधारणा घडवून आणतील. अनेक जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना सुरक्षित व अधिक सोयीस्कर निवासस्थान मिळणार असल्याने या प्रकल्पांकडे मोठ्या आशेने पाहिले जात आहे.


 


पुढील काही वर्षांत हे प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर मुंबईचा चेहरामोहरा मोठ्या प्रमाणात बदललेला दिसेल. जुन्या वसाहतींच्या जागी आधुनिक, नियोजित आणि जागतिक दर्जाच्या टाउनशिप उभ्या राहतील. त्यामुळे म्हाडाचा हा ९२५ एकरांचा पुनर्विकास आराखडा केवळ गृहनिर्माण प्रकल्प नसून मुंबईच्या भविष्यातील विकासाचा पाया ठरणार असल्याचे मानले जात आहे

Comments
Add Comment

BMC News : मालाड धारवलीत अनधिकृत डेब्रीज टाकणाऱ्यांविरोधात एफआयआर; महापालिकेने कंबर कसली, आता यापुढे गय केली जाणार नाही!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने बांधकाम व पाडकामाचा रोडारोड्याची अनधिकृत विल्हेवाट

BMC News : मुंबईत स्मार्ट कृत्रिम टर्फ धोरणाची मागणी; महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी नगरसेवकाने केली सूचना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांचे मोकळे मैदान, सार्वजनिक शांतता आणि आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी, 'कृत्रिम टर्फ'

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित

PoP ban : पीओपी बंदीवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणस्नेही सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे