COLD WAR : उबाठा गटातील अंतर्गत वाद; भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात शाब्दिक युद्ध

मुंबई: राज्यात एका बाजूला उबाठा गटातील ६ खासदारांच्या बंडखोरीमुळे राजकीय वातावरण तापलेले असतानाच, आता पक्षात अंतर्गत वादाची ठिणगी पडली आहे. उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू व खंदे शिलेदार मिलिंद नार्वेकर यांच्यात सुरू झालेली शाब्दिक चकमक सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.




वादाची सुरुवात: 'नार्वेकर कोण लागून गेला?'


१९ जून रोजी षण्मुखानंद सभागृहात उबाठा गटाचा वर्धापन दिन सोहळा पार पडला. या कार्यक्रमादरम्यान भास्कर जाधव यांनी रागाच्या भरात "नार्वेकर कोण लागून गेला?" असे विधान केले. या विधानाने पक्षात खळबळ उडाली. यावर मिलिंद नार्वेकर यांनी 'एक्स' (ट्विटर) वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत खोचक पलटवार केला. नार्वेकर म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धवजींच्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा. कारण यांच्या मानसिक त्रासाचा आणि चिडचिडीचा फटका माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना विनाकारण बसत आहे."



भास्कर जाधवांचे स्पष्टीकरण आणि टोलेबाजी


या वादावर सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना भास्कर जाधव यांनी आपली भूमिका मांडली:





  • गैरसमजाचा खुलासा: जाधव म्हणाले, "मिलिंद नार्वेकर माझे जवळचे मित्र आहेत. वर्धापन दिनी गर्दी असताना पाठीमागून एका गाडीचा कर्कश हॉर्न वाजत होता. ती गाडी कोणाची विचारल्यावर 'नार्वेकरांची' असे सांगण्यात आले. राहुल नार्वेकरांच्या कार्यपद्धतीमुळे मी आधीच संतापलो होतो, त्यामुळे 'नार्वेकर असले म्हणून काय झाले?' असे माझ्या तोंडून निघून गेले. मिलिंद नार्वेकर इतके 'हळवे' असतील असे वाटले नव्हते, मी त्यांना खूप कणखर समजतो."





'विरोधी पक्षनेते' पदावरून उपरोधिक टोला


भास्कर जाधव यांनी मिलिंद नार्वेकरांच्या सर्वपक्षीय संबंधांवरून त्यांना चांगलेच सुनावले:





  • "नार्वेकर यांचे सर्वच राजकीय पक्षांत उत्तम संबंध आहेत, हे जगाला माहीत आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून जे ट्विट केले आहे, त्याचा वापर करून ते मला 'विरोधी पक्षनेते' करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे शब्द टाकणार असतील, तर मला खूप आनंद होईल."




  • पुढे ते म्हणाले, "मला विरोधी पक्षनेतेपद अद्याप मिळाले नाही, यावरून माझ्यापेक्षा मिलिंद नार्वेकर यांनाच जास्त मानसिक त्रास होतोय, हे पाहून समाधान वाटले. आता त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलेच आहे, तर लवकरच मी विरोधी पक्षनेता होईन अशी मला अपेक्षा आहे," अशा तिरकस शब्दांत त्यांनी आपली नाराजी आणि उपरोधिक टोला व्यक्त केला.



Comments
Add Comment

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुलैत तीन दिवसांच्या महाराजस्व मोहिमेचे आयोजन

२१ ते २३ जुलैदरम्यान ५० लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत

Gokul Gite : विजयाच्या काही तासांतच मोठी राजकीय घडामोड; गोकुळ गिते शिंदेंच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना

Nashik Vidhan Parishad Election : नाशिक विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे

Mumbai Crime : लग्नाला नकार दिला म्हणून प्रियकराच्या आईलाच टार्गेट; तरुणीने केले अश्लील फोटो व्हायरल

मुंबई : लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका तरुणीने प्रियकराच्या आईलाच लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर

Nashik : वणी येथे मंडप काढताना विजेचा धक्का लागून मंडप व्यावसायिकाचा मृत्यू

दिंडोरी : वणी येथे लग्नाचा मंडप काढण्यासाठी गेलेल्या मंडप व्यावसायिकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

Massive Fire : लखनौमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग; विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी इमारतीतून थरारक उड्या

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीने मोठी खळबळ उडवून

Nashik : नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी महावितरणाची 'तारीख पे तारीख'; मंत्री भुजबळांच्या शिफारस पत्राला महावितरणकडून केराची टोपली

Nashik : लोकप्रतिनिधींच्या पत्रालाही किंमत नाही आणि सामान्य जनतेच्या हक्काचीही दखल घेतली जात नाही, असा संतापजनक