Rajmata Jijau Women's Empowerment Scheme : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना मिळणार केवळ १ रुपयात जमीन

- महिलांच्या सक्षमीकरणाला चालना


मुंबई : राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आणि विशेषतः त्यांच्या विधवांना आर्थिक आधार देण्यासाठी फडणवीस सरकारने (Fadnavis Government) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अंतर्गत शेतकरी विधवांच्या महिला बचत गटांना विविध व्यवसाय आणि शेतीसाठी शासकीय पडीक जमीन अत्यल्प दरात उपलब्ध करून दिली जाणार आहे. (Rajmata Jijau Women's Empowerment Scheme)


राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Revenue Minister Chandrashekhar Bawankule) यांनी या निर्णयाची घोषणा केली असून, यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला मोठी चालना मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.



‘राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजने’अंतर्गत लाभ :


हा निर्णय ‘राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजने’ (Rajmata Jijau Women Empowerment Scheme) अंतर्गत लागू करण्यात आला आहे. या योजनेनुसार पात्र महिला बचत गटांना शासकीय पडीक जमीन केवळ १ रुपया नाममात्र दराने उपलब्ध करून दिली जाणार आहे. या जमिनींचा उपयोग महिलांना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी केला जाणार आहे.



चारा, बांबू आणि नर्सरीसाठी वापराची मुभा :


सरकारने या जमिनीच्या वापराबाबत विशिष्ट अटी निश्चित केल्या आहेत.


- जनावरांच्या चाऱ्यासाठी जमीन ३ वर्षांसाठी वापरता येणार
- बांबू लागवडीसाठी १० वर्षांचा दीर्घकालीन वापर
- नर्सरी उभारणीस परवानगी
- तसेच अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी आवश्यक कच्च्या मालाचे उत्पादन करण्याची मुभा


या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे पर्याय उपलब्ध होणार आहेत. (Rajmata Jijau Women's Empowerment Scheme)



जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अंमलबजावणी :


योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी (District Collector) तहसीलदारांच्या माध्यमातून संबंधित तालुक्यांतील शासकीय पडीक जमिनींची ओळख पटवणार आहेत. ही जमीन वैयक्तिक नव्हे तर ‘माविम’ (MAVIM), ‘उमेद’ (UMED) अंतर्गत येणाऱ्या महिला बचत गटांना तसेच ग्रामसंघांना दिली जाणार आहे. (Rajmata Jijau Women's Empowerment Scheme)



महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला बळ :


या निर्णयामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांना केवळ मदतच नव्हे, तर स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी हक्काचे साधन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती वाढून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी गती मिळेल, असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे. (Rajmata Jijau Women's Empowerment Scheme)

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान

Energy and Nanotechnology : पुणे आणि मुंबई विद्यापीठांचा अनोखा उपक्रम; ऊर्जा आणि नॅनोटेकनॉलॉजीमध्ये संयुक्त एमटेक अभ्यासक्रम सुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि मुंबई विद्यापीठ (MU) यांच्यातर्फे संयुक्त पदव्युत्तर तंत्रज्ञान

Pandavkada Waterfall : पावसाळी सहल ठरली जीवघेणी; कुर्ल्यातील १६ वर्षीय मुलाचा खारघरमधील पांडवकडा धबधब्यात बुडून मृत्यू

नवी मुंबई : खारघरमधील पांडवकडा धबधब्यात मंगळवारी संध्याकाळी एका १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. या

Nitesh Rane : श्रीवर्धन तालुक्यातील मच्छिमार बांधवांवरील गुन्हे मागे घेणार

- मंत्री नितेश राणे; खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक मुंबई : रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल

Deemed Conveyance : राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या 'डीम्ड कन्व्हेअन्स'चा मार्ग मोकळा

- मालमत्ता पत्रक आणि सातबारावर सोसायटीच्या नावाची नोंद होणार - स्वयंपुनर्विकासासाठी प्रोत्साहन आणि कर सवलतींची

Dhiraj Kalawate Organ Donation : धिरजचा श्वास थांबला पण अवयवदानातून अनेकांचे श्वास राहणार सुरू

अमरावती : एका आठवड्यापूर्वी, आपल्या मित्रांसोबत केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देऊन आनंदाने घरी परतलेल्या ३०