Chandrashekhar Bawankule : सिंधी विस्थापितांच्या विशेष अभय योजनेला वर्षभराची मुदतवाढ

मुंबई, राज्यातील सिंधी विस्थापितांच्या निवासी व व्यावसायिक जमिनींचे शर्तभंग नियमितीकरण करून त्या पूर्णपणे मालकी हक्काच्या (फ्री-होल्ड) करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘विशेष अभय योजना-२०२५’ ला १५ मे २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM.Devendra fadnavis)  यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला.



मे २०२५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याने आणि अनेक अर्ज व कागदपत्रांची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याने कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी आता १५ मे २०२७ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. हा निर्णय ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर वगळता राज्यातील इतर सर्व अधिसूचित भागांतील सिंधी बांधवांसाठी लागू राहणार आहे.



महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, सिंधी विस्थापितांच्या जमिनींच्या नियमितीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. विशेष अभय योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, भूमिकेतून या योजनेला आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Schools Open : राज्यातील सर्व शाळा गुरुवारी सुरू राहणार; शाळा बंद ठेवल्यास वेतन कपातीची कारवाई

मुंबई : ९ जुलै २०२६ रोजी प्रस्तावित शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोणतीही शाळा बंद राहणार

Central Railway : मुसळधार पावसानंतर रेल्वेची शर्यत! लोणावळा–कर्जत मार्गावर १,१०० हून अधिक कामगारांचे युद्धपातळीवर काम; एक रेल्वे मार्ग सुरू

मुंबई : लोणावळा–कर्जत घाट विभागात मुसळधार पावसामुळे झालेल्या दरडी कोसळण्याच्या घटनेनंतर मध्य रेल्वेने रेल्वे

Hasan Mushrif : राज्यात नर्सिंग शिक्षणाच्या विस्ताराला मान्यता - मंत्री हसन मुश्रीफ

- कमी शुल्कामध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणार मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी कुशल परिचारिकांची

Devendra Fadnavis : सावंतवाडीत आता 'राजधानी'सह ३ महत्त्वाच्या गाड्या थांबणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मंजुरीचे पत्र मुंबई : कोकण रेल्वेवरील प्रवाशांसाठी आणि विशेषतः

Pratap Sarnaik : एसटी महामंडळाचा कायापालट होणार; जुन्या बसेस बदलून ताफ्यात ई-बसेस येणार

- दुर्गम भागासाठी २००० मिडी बसेस सज्ज; मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानपरिषदेत घोषणा मुंबई : भविष्यात एसटी

Devendra Fadnavis : मुंबईच्या पूर नियंत्रणासाठी १३ हजार कोटींचा आराखडा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

- 'फडणवीसांना बदनाम करा, पण महाराष्ट्राला नको', विरोधकांना आवाहन मुंबई : "मुंबईला दरवर्षी भेडसावणाऱ्या