Labour Minister Adv. Akash Fundkar : नवीन कामगार संहितांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करावे

मुंबई: बदलत्या औद्योगिक आणि आर्थिक परिस्थितीत नवीन कामगार संहितांची प्रभावी अंमल बजावणी ही काळाची गरज आहे. त्यासाठी सक्षम, प्रशिक्षित आणि अभ्यासू अधिकारी वर्ग तयार होणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रशिक्षणातून सहभागी अधिकारी हे केवळ प्रशिक्षणार्थी न राहता ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून उदयास यावेत आणि कामगार विभागातील इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांपर्यंत नवीन कामगार कायद्यांचे ज्ञान पोहोचवावे, असे प्रतिपादन कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले आहे.


परळ येथील ना.मे.लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेच्या वतीने आयोजित ‘नवीन कामगार संहिता आणि कामगार कायद्यातील बदल’ या विषयावरील चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मंत्री ॲड. फुंडकर बोलत होते.प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधित करताना मंत्री ॲड. फुंडकर म्हणाले, कामगार विभाग हा शासन आणि समाज यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. कामगारांचे संरक्षण, सामाजिक सुरक्षा आणि उद्योगांच्या प्रगतीसाठी विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या जबाबदाऱ्या संवेदनशीलतेने आणि कार्यक्षमतेने पार पाडाव्यात. नवीन कामगार संहितांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांचा लाभ कामगार आणि उद्योग या दोन्ही घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहावे.


संस्थेच्या संचालक रोशनी कदम - पाटील यांनी आपल्या मनोगतात प्रशिक्षण कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट करुन अधिकारी वर्गाची भूमिका विषद केली. राज्यातील विविध विभागांतून आलेले कामगार विभागाचे अधिकारी, प्रशिक्षणार्थी तसेच संस्थेचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. नवीन कामगार संहितांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित अधिकारी वर्ग हीच खरी ताकद असल्याचा संदेश या कार्यक्रमातून अधोरेखित झाला. प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ना.मे.लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेच्या वतीने करण्यात आले.

Comments
Add Comment

Fuel theft racket busted in Wadala : वडाळ्यात इंधन चोरीचा पर्दाफाश; अन्न, नागरी पुरवठा विभागाची धडक कारवाई, १.३१ कोटींचा मुद्देमाल जप्त

मुंबई: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दक्षता पथकाने वडाळा येथे धडक कारवाई करत पेट्रोल, डिझेल आणि

Cabinet sub-committee's decision : सामाजिक, राजकीय आंदोलनातील 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

मुंबई: राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा निर्णय

Rashmi Shukla : रश्मी शुक्लांकडे नवी जबाबदारी, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या व्यवहारांवर राहणार करडी नजर

मुंबई : महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक (DGP) रश्मी शुक्ला यांच्यावर नव्या जबाबदारीची धुरा सोपवण्यात आली आहे.

Dharavi Redevelopment Vijay Singhal : विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसनाच्या विशेष कार्य अधिकारी पदी नियुक्ती

- राज्य शासनाकडून १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी (१६ जून) बारा सनदी

BMC APP : रस्त्यांवर खड्डे दिवसात का? करा माय बीएमसी मार्ग ऍपवर तक्रार

Mumbai : नागरिकांच्या तक्रारींचे जलद व प्रभावी निवारण करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने या वर्षी ‘MyBMC MARG’

BMC : घरकाम करणाऱ्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी पालिकेचे 'अ‍ॅप' विकसित करा; महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षांची मागणी

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या महिला बचत गटातील सदस्यांना हक्काचा रोजगार