Cabinet meeting : ग्रामीण महाराष्ट्रात पाणीपट्टीचा दर आता किमान १५० रुपये

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; 'ग्रामीण पेय जल धोरण २०२६ जाहीर'


मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी आणि नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी राज्य सरकारने पाणीपट्टीच्या दरांमध्ये मोठे बदल केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण - २०२६’ ला मंजुरी देण्यात आली. या नव्या धोरणानुसार, ग्रामीण भागातील घरगुती नळ जोडणीसाठी आता प्रति महिना किमान १५० रुपये, तर कमाल ४०० रुपये इतकी पाणीपट्टी निश्चित करण्यात आली आहे. गावातील पाणी योजनांचा देखभाल-दुरुस्ती खर्च १०० टक्के वसूल व्हावा, या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला आहे.(Vaibhav Sooryvanshi)


'जलजीवन मिशन २.०' अंतर्गत उभारण्यात आलेल्या पाणी योजनांची घडी विस्कळीत होऊ नये, यासाठी हा सर्वंकष आराखडा तयार करण्यात आला आहे. या धोरणामुळे नव्या आणि जुन्या योजनांची पडताळणी करून दीर्घकालीन शाश्वत पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. पाणीपुरवठा योजनांचा दैनंदिन खर्च आणि गावातील लाभार्थींची संख्या पाहून पाणीपट्टीचे अंतिम दर ठरवण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. दर निश्चित करताना गावातील एकूण लोकसंख्या, कुटुंबातील सदस्य संख्या आणि कुटुंबांकडे असणाऱ्या गुरांची संख्या हे घटक विचारात घेतले जातील. प्रत्यक्ष देखभाल खर्च लक्षात घेऊन किमान १५० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असणारा योग्य दर आकारला जाईल. ही पाणीपट्टी १०० टक्के वसूल करणे स्थानिक स्वराज्य संस्थांना बंधनकारक राहील. जर वसुलीत तूट आली, तर ती भरून काढण्यासाठी ग्रामपंचायतींना १५ व्या किंवा १६ व्या वित्त आयोगाचा निधी वापरता येईल, अशीही तरतूद करण्यात आली आहे.



महिला बचत गटांना प्राधान्य


पाणीपट्टीच्या देयकांचे वितरण, वसुली आणि देखभालीचे काम त्रयस्थ संस्थेला देताना स्थानिक महिला बचत गट आणि प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांना प्राधान्य दिले जाईल. तसेच पाणी पुरवठ्यावर मध्यवर्ती लक्ष ठेवण्यासाठी 'सेंट्रल कमांड सेंटर' आणि तक्रार निवारणासाठी 'नल जल सेवा ॲप्लिकेशन' सुरू केले जाणार आहे. बहुग्राम पाणी पुरवठा योजनांसाठी अत्याधुनिक 'स्काडा' प्रणाली आणि मालमत्तांच्या रिअल टाईम देखरेखीसाठी जीआयएस तंत्रज्ञानाचा विस्तार केला जाईल, अशी माहिती देण्यात आली.

Comments
Add Comment

Gadchiroli to Australia : लॉयड्स मेटल्सची चौथी 'ग्लोबल एज्युकेशन' बॅच; गुणवंत विद्यार्थ्यांसाठी संधी

गडचिरोली: गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि नक्षलवादग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आता जागतिक पंख

बंदर कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी राज्यातील सहा आयटीआयमध्ये विशेष अभ्यासक्रम - मंत्री नितेश राणे

मुंबई: सिंधुदुर्ग, नाशिक, पालघर, औंध-पुणे, नागपूर आणि मुंबई येथील निवडक सहा आयटीआय संस्थांमध्ये बंदरे क्षेत्राशी

Operation Tiger : मंत्रिपदाच्या हट्टामुळे अडले 'ऑपरेशन टायगर'?

 ४ खासदार उत्सुक; मराठवाड्यातील 'त्या' नेत्याला लॉटरी लागण्याची शक्यता मुंबई : उबाठा गटातील अंतर्गत अस्वस्थतेचा

Nitesh Rane : रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा

मुंबई,  : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक

Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारूनही शंभूराज देसाईंच्या मनाविरुद्ध घडले

 सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक; महायुतीच्याच उमेदवाराला मतदान करण्याचे एकनाथ शिंदेंचे आदेश मुंबई :

Romania Bipin Kumar : बर्फाळ तलावातून चिमुरडीला वाचवणाऱ्या विपिन कुमार यांना 'मानद नागरिकत्व'

रोमानिया: रोमानियातील क्रायोवा शहरात एका भारतीय नागरिकाने माणुसकीचे उत्तम उदाहरण पेश केले आहे. गोठवणाऱ्या