Navi Mumbai Crime : पतीने केला पत्नी आणि सासूवर चाकूने सपासप वार ; दोघींचा जागीच मृत्यू

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार सोमवारी पहाटे घडला. एका जावयाने आपल्या पत्नी आणि सासूवर चाकूचे वार करून क्रूरपणे हत्या केली. अशी खळबळजनक घटना समोर अली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.



नक्की प्रकार काय ?
आरोपी आरोपी बाळू निकाळजे (वय27) याने पाच ते सहा वर्षांपूर्वी अपर्णा गोसावी या तरुणीशी प्रेमविवाह केला होता. लग्न झाले त्यानंतर बाळू हा नेरुळमधील शिरवण येथे पत्नी आणि सासू मालन गोसावी (वय55) यांच्यासोबत राहत होता. पण दरदिवसा त्यांच्या घरात काहीना काही कारणांवरून वाद होत असायचे. फक्त वाद नाही तर आरोपीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे त्यांच्यात सतत भांडणे होते असत.भांडणाला कंटाळून आरोपी काही दिवसांसाठी बाहेरगावी राहायला गेला. मात्र तीन दिवसानंतर तो परत सासूच्या घरी राहायला आला.



स्थानिक नागरिकांनी सांगितल्या प्रमाणे : आरोपी पहाटे घरी आला. तो घरी गेल्या नंतर थोड्या वेळाने त्याच्या घरातून सासू आणि पत्नी च्या ओरडण्याचा आवाज आला. शेजाऱ्यांनी जाऊन पहिले तर बाळू त्याच्या सासू आणि पत्नी वर चाकूने सपासप वर करत होता. शेजाऱ्यांनी त्याला जाऊन अडवलं परंतु दोघीही गंभीर जखमी असल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या बाबत माहिती मिळताच नेरुळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला तातडीने अटक केली.

Comments
Add Comment

Mirabai Chanu : मीराबाई चानूची सोनेरी हॅटट्रिक!

ग्लासगो : भारताची स्टार वेटलिफ्टर आणि ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानू हिने ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा

Ind vs Zim : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने जिंकली पहिली टी-२० मालिका; झिम्बाब्वेचा ३-० ने व्हाईटवॉश !

भारताचा ३५ धावांनी दणदणीत विजय ! हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Question Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीविरोधी नवीन विधेयक लोकसभेत सादर होणार

नवी दिल्ली: प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणावरून संसदेत निर्माण झालेला गतिरोध आता संपण्याची चिन्हे असून, आंदोलक

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Narendra Modi : परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात उच्चाधिकार समितीची स्थापना, PM मोदींचा निर्णय

नवी दिल्ली : परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात