Solapur Accident :म्हसवड-पंढरपूर महामार्गावरील अपघातात राज्य सरकारची मोठी कारवाई

सोलापूर : म्हसवड -पंढरपूर महामार्गावरील तांदळवाडीजवळ एक वेगाने प्रवास करत असलेले वाहन विहिरीत पडले. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला. स्थानिकांनी सहा जणांना वाचवले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ८ जणांच्या वारसांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच अपघात प्रकरणी नव्या रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.



नेमकं काय झालं ?


पंढरपूर येथील बावचे कुटुंबीय आणि नातेवाईक असे एकूण १४ जण एका पिकअपमधून देवदर्शनासाठी म्हसवड येथे गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर दुपारी ते परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र, तांदळवाडीजवळ आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पिकअप थेट रस्त्यालगतच्या पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली. अपघात होताच मोठा आवाज आला. आवाज ऐकताच स्थानिकांनी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले.



स्थानिकांनी दिली धक्कादायक माहिती


अपघात ज्या भागात झाला त्या भागात रस्ता तयार करायला घेतला, तेव्हा रस्त्याची उंची खूप वाढवली गेली आणि स्थानिकांच्या जमिनी आणि विहीर खाली राहिल्या. रस्ता उंचावल्यामुळे अपघात होऊन गाड्या थेट विहिरीत जाऊ शकतात, हे ओळखून त्याचवेळी मजबूत संरक्षक भिंत अर्थात कठडा बांधण्याची मागणी केली होती. ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही, असे स्थानिकांनी सांगितले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया


सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदळवाडीत जो अपघात झाला त्या अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. अपघातात सुदैवाने काही जणांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. या घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रूपये आर्थिक मदत राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Comments
Add Comment

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात

Wardha Accident : ट्रॅव्हल्स बसमुळे चिरडून वर्ध्यात तीन मुलींचा जागीच मृत्यू

वर्धा : देशभर स्वातंत्रदिनाचा उत्साह असताना वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मेडिकल