Maharashtra Monsoon Weather Alert : महाराष्ट्राची पावसासाठी प्रतीक्षा वाढली! मॉन्सून पुन्हा लांबला; एल निनोचं संकट कायम

मुंबई : राज्यात १५ जूनपासून दमदार पावसाची अपेक्षा असताना मॉन्सूनने (Maharashtra Monsoon Weather Alert) पुन्हा एकदा शेतकऱ्यांची निराशा केली आहे. अरबी समुद्रातील मॉन्सूनची वाटचाल सध्या ठप्प झाली असून, अफगाणिस्तानच्या दिशेने निर्माण झालेल्या वादळी प्रणालीमुळे मॉन्सूनच्या पुढील प्रगतीला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मॉन्सूनच्या आगमनासाठी आता २० जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.


यापूर्वी ११ जून, त्यानंतर १५ जून अशी मॉन्सून आगमनाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता हा अंदाज थेट २० जूनपर्यंत पुढे ढकलला गेला आहे. त्यामुळे पेरण्या रखडल्या असून शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. जलसाठ्यांची पातळीही घटत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)


दरम्यान, यंदा एल निनोचा प्रभावही राज्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याने पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतीय हवामान विभागानेही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, कृषी विभागाने शेतकऱ्यांना अधिकृत सूचना मिळेपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संभाव्य नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)



सध्या मॉन्सूनने पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या काही भागात प्रगती केली असली तरी अरबी समुद्रात गेल्या आठ दिवसांपासून कोणतीही विशेष हालचाल दिसून आलेली नाही. पुढील चार ते पाच दिवसांत मॉन्सून पुन्हा वेग घेण्याची शक्यता असून कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये त्याचा प्रभाव वाढू शकतो. (Maharashtra Monsoon Weather Alert)


राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट कायम असून नागरिक त्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या सरी कोसळत असल्या तरी सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती जोरदार मॉन्सून पावसाची. आता २० जूननंतरच महाराष्ट्रात व्यापक पावसाची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहेत. (Maharashtra Monsoon Weather Alert)

Comments
Add Comment

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Dog Attack : रेबीजमुळे चिमुकल्या समर्थ स्वामीचा दुर्दैवी मृत्यू; भटक्या कुत्र्यांवर कारवाईची मागणी

सोलापूर : भवानी पेठ परिसरातील घोंगडे वस्ती येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या समर्थ स्वामी या

Amravati News : धक्कादायक! आश्रमशाळेतील ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; जेवणानंतर उलट्या, पोटदुखीने उडाली खळबळ

अमरावती : अमरावतीच्या मेळघाट परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धारणी तालुक्यातील टीटंबा येथील शासकीय

Mumbai-Pune Water Update : मुंबई-पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! धरणांत मुबलक जलसाठा; पाहा कोणत्या तलावात किती टक्के पाणी ?

मुंबई : यंदाच्या मान्सूनने सुरुवातीला हुलकावणी दिली असली, तरी जुलै महिन्यात मुंबई (Mumbai) आणि पुण्याच्या पाणलोट

Ashadhi Ekadashi 2026 : विठ्ठलाच्या मूर्तीवरील प्रत्येक खूण सांगते एक कथा! जाणून घ्या दडलेले आध्यात्मिक अर्थ

विठ्ठलाच्या (Vitthal) मूर्तीवरील प्रत्येक खूण का आहे खास? https://prahaar.in/2026/07/25/pune-metro-news-hinjawadi-shivajinagar-pune-metro-li

Pune Metro : IT कर्मचाऱ्यांची ट्रॅफिकमधून सुटका! हिंजवडी मेट्रोला अखेर 'ग्रीन सिग्नल'; माण ते बालेवाडी प्रवासी सेवेचा मार्ग मोकळा

पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडीची डोकेदुखी ठरलेल्या हिंजवडी IT पार्कच्या प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक आणि मोठी