Raigad Accident : रत्नागिरीत जयगड जेसडब्ल्यू पोर्टवर ४५ मीटर उंचीवरून कोसळून कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी : जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्टवर काम करणाऱ्या एका ३७ वर्षीय कामगाराचा ४५ मीटर उंचीवरून खाली पडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी सायंकाळी झाली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कामगाराचे नाव राजुकुमार बालेश्वर सिंह (रा. सेमरा, अनुग्रह नगर, सिवान, बिहार) असे आहे. तो पोर्ट परिसरातील बी-५ कोल शेडवर उंचावर लोखंडी पर्लिंगचे काम करत होता. शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कामाची वेळ संपल्यानंतर राजुकुमार इतर सहकाऱ्यांसोबत खाली उतरत होता. त्यावेळी त्याने सुरक्षा हूकचा वापर केला होता. मात्र, पुढे सरकताना हूक बदलण्याच्या प्रक्रियेदरम्यान तो व्यवस्थित अडकला नाही. त्याच वेळी त्याचा पाय फायबरच्या पत्र्यावर पडला. वजनाचा ताण सहन न झाल्याने पत्रा तुटला आणि राजुकुमार ४५ मीटर उंचीवरून जमिनीवर कोसळला. त्यामुळे त्याच्या हाताला, पायाला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्याला वाटद खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो मरण पावल्याचे सांगितले. या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Mankhurd Incident : मुंबई हादरली! मानखुर्दमध्ये तीन मजली इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील (Mumbai) मानखुर्द (Mankhurd) परिसरात रविवारी (५ जुलै) रात्री एक अत्यंत दुर्दैवी दुर्घटना (Accident) घडली.

Mankhurd : मानखुर्दमध्ये चाळीचा भाग कोसळला, पाच जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

मुंबई : मुंबईत सतत पडत असलेल्या पावसामुळे मानखुर्दमध्ये एक मोठी दुर्घटना झाली आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरांतील

Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण' लवकरच ताफ्यात येणार

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढणार असून लवकरच ‘आयएनएस महेंद्रगिरी’ आणि ‘आयएनएस मालवण’ या दोन

School - College Holidays : मोठी बातमी! मुंबई, ठाणे, पनवेलसह सर्व शाळा-महाविद्यालयांना उद्या सुटी; मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचा महत्वाचा निर्णय

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे आणि पनवेल येथे सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी ऑरेंज अलर्ट जारी करत मुसळधार

Prakash Abitkar : वारीत अत्यावश्यक रुग्णांसाठी प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा!

भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची आणि आरोग्य संपन्न वारी या डिजिटल उपक्रमाची सुरुवात मुंबई : आषाढी यात्रेच्या

Indian Navy : भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या सिंगापूर भेटीची यशस्वी सांगता

नवी दिल्ली : भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ सामरिक आणि सागरी भागीदारी अधिक मजबूत करत भारतीय नौदलाच्या पूर्व