Monsoon Update : मान्सूनची महाराष्ट्राला प्रतीक्षा! एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

Monsoon Update : राज्यात वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून सर्वांचे लक्ष आता मान्सूनकडे (Monsoon) लागले आहे. मात्र जून (June) महिन्याचा अर्धा कालावधी उलटल्यानंतरही मान्सूनची अपेक्षित प्रगती न झाल्याने चिंता वाढली आहे. हवामान विभागाने (Meteorological Department) यापूर्वी १५ ते १६ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) व्यापेल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र सध्याची परिस्थिती पाहता मान्सूनची वाटचाल मंदावली असून राज्यभर पोहोचण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.



सध्या मान्सून तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांपर्यंतच पोहोचला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये होत असलेला पाऊस हा पूर्वमोसमी स्वरूपाचा असून खरी मान्सूनची सक्रियता अद्याप दिसून आलेली नाही. पुढील चार ते पाच दिवसांतही मान्सून पुण्यासह राज्याच्या अंतर्गत भागात वेगाने पुढे सरकण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.


दरम्यान, पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती सक्रिय होत असल्याने यंदाच्या मान्सूनवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोमुळे भारतातील पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे महाराष्ट्रात यंदा सरासरीच्या सुमारे ९० टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.



हवामान तज्ज्ञांच्या मते, जून ते सप्टेंबर या संपूर्ण पावसाळी हंगामात एल निनोचा प्रभाव कायम राहू शकतो. विशेषतः मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितले की, मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी सध्या वातावरणीय परिस्थिती अनुकूल नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ पूर्वमोसमी पावसावर विश्वास ठेवून घाईघाईने पेरणी करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.


मान्सूनच्या उशिरामुळे शेती, जलसाठे आणि पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाबाबत चिंता वाढत असून राज्यातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.

Comments
Add Comment

Ratnagiri News : धक्कादायक! दिड वर्षांच्या चिमुकल्यासह आईने मारली मांडवी एक्सप्रेसमधून उडी

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक (Ratnagiri News) अत्यंत धक्कादायक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.

Jalna Bus Accident : जालना-बीड महामार्गावर भीषण अपघात! दोन एसटी बसची समोरासमोर धडक; चालकांसहअनेक प्रवासी जखमी

जालना : जालना-बीड महामार्गावर शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. अंबड तालुक्यातील शहापूरजवळ गल्हाटी नदीच्या पुलावर

Devendra Fadnavis : हवामान विभागाचे अलर्ट पाहूनच घराबाहेर पडा!

मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन; कनेक्टिंग लिंकवरील खड्ड्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर मुंबई : "राज्यात

KOYANA DAM : कोयना धरणात पाण्याची झपाट्याने वाढ; २४ तासांत २.१६ टीएमसीची आवक, विसर्गाबाबत प्रशासन सतर्क

कराड (सातारा) : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ

Ashadhi Wari 2026 : यंदाची वारी ठरणार वेगळी! जाणून घ्या पोलिसांनी केलेली खास तयारी

पुणे : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी (Palkhi) सोहळ्यासाठी

Ketan Agrawal Murder Case : ...अखेर खेळ उलटला! केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया-चेतनला दिलासा, कोर्टाने मागणी फेटाळली

सिया चेतनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, पोलिसांची मागणी फेटाळली पुणे : केतन अग्रवाल हत्या (Ketan Agrawal Murder Case) प्रकरणात