Jharkhand News : झारखंडमध्ये वीज कोसळून ७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये महिला आणि १० वर्षीय मुलाचा समावेश

झारखंड : झारखंडमध्ये (Jharkhand) मान्सूनपूर्व (Pre-Monsoon) काळात वीज कोसळण्याच्या (Lightning Strike) घटनांमध्ये गेल्या २४ तासांत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि एका १० वर्षीय मुलाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.


पोलीस (Police) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रांची (Ranchi) आणि गरवा (Garhwa) जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला असून दोन्ही ठिकाणी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. रांची जिल्ह्यातील पिथोरिया (Pithoria) परिसरातील बरहू गावचे जितू महाली (५५) आणि कटमकुली गावातील निराशा देवी (३३) हे शेतात काम करत असताना त्यांच्यावर वीज कोसळली. या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी (Postmortem) पाठवण्यात आले आहेत.



दरम्यान, गरवा जिल्ह्यातील सुंडी गावातील रीना देवी (३०) आणि मुकुंदपूर गावातील राम अवतार पाल (६५) यांचाही वीज पडून मृत्यू झाला. याशिवाय छत्रा (Chatra), गिरिडीह (Giridih) आणि सेराईकेला-खरसावन (Seraikela-Kharsawan) जिल्ह्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये आणखी तीन जणांचा जीव गेला.


झारखंडमध्ये सध्या हवामानातील (Weather) बदलांमुळे वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून प्रशासनाने (Administration) नागरिकांना सतर्क (Alert) राहण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

Sanjay Upadhyay : बोरिवलीतून एसी लोकलची संख्या वाढवा, आमदार उपाध्यायांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

नवी दिल्ली : मुंबईतील बोरीवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय उपाध्याय यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी

Mumbai-Ahmedabad Bullet Train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार? रेल्वेमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट

मुंबई : भारताच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मोठी आणि दिलासादायक माहिती समोर आली

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या फ्रान्स दौऱ्याला सुरुवात; नीसमध्ये भारतीय समुदायाकडून जल्लोषात स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शनिवारी फ्रान्सच्या अधिकृत दौऱ्यावर नीस शहरात दाखल झाले. फ्रान्सचे

Drone-based postal delivery : हिमाचलमध्ये ड्रोनद्वारे टपाल वितरणाची चाचणी यशस्वी

मंडी : हिमाचल प्रदेशात आता ड्रोनने घरोघरी टपाल पोहोचेल. या दिशेने भारतीय टपाल विभागाने मंडी येथे यशस्वी चाचणी

Indian Army Chief : लेफ्टनंट जनरल धीरज सेठ नवे लष्करप्रमुख

नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल धीरज सेठ आता देशाचे नवे ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ’ अर्थात लष्करप्रमुख असणार आहेत.

Indian Air Force AN-32 Plane Crashes : आसाममध्ये हवाई दलाच्या AN-३२ विमानाचा भीषण अपघात; पायलटसह ५ जवान शहीद, सहवैमानिक गंभीर जखमी

आसाम : आसाममधील जोरहाट येथील भारतीय हवाई दलाच्या एअरफोर्स स्टेशनवर शनिवारी सकाळी झालेल्या AN-३२ मालवाहू