Jharkhand News : झारखंडमध्ये वीज कोसळून ७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये महिला आणि १० वर्षीय मुलाचा समावेश

झारखंड : झारखंडमध्ये (Jharkhand) मान्सूनपूर्व (Pre-Monsoon) काळात वीज कोसळण्याच्या (Lightning Strike) घटनांमध्ये गेल्या २४ तासांत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि एका १० वर्षीय मुलाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.


पोलीस (Police) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रांची (Ranchi) आणि गरवा (Garhwa) जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला असून दोन्ही ठिकाणी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. रांची जिल्ह्यातील पिथोरिया (Pithoria) परिसरातील बरहू गावचे जितू महाली (५५) आणि कटमकुली गावातील निराशा देवी (३३) हे शेतात काम करत असताना त्यांच्यावर वीज कोसळली. या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी (Postmortem) पाठवण्यात आले आहेत.



दरम्यान, गरवा जिल्ह्यातील सुंडी गावातील रीना देवी (३०) आणि मुकुंदपूर गावातील राम अवतार पाल (६५) यांचाही वीज पडून मृत्यू झाला. याशिवाय छत्रा (Chatra), गिरिडीह (Giridih) आणि सेराईकेला-खरसावन (Seraikela-Kharsawan) जिल्ह्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये आणखी तीन जणांचा जीव गेला.


झारखंडमध्ये सध्या हवामानातील (Weather) बदलांमुळे वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून प्रशासनाने (Administration) नागरिकांना सतर्क (Alert) राहण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

Gallantry and Service Medal : देशातील पोलीस, अग्निशमन दल आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांच्या १०५७ जणांना पदके जाहीर

नवी दिल्ली : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे औचित्य साधून देशातील पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक, नागरी

Chamoli tunnel tragedy : ७ कामगारांचा मृत्यू; ३ अद्याप बेपत्ता, बचावकार्य युद्धपातळीवर

चमोली : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील पीपलकोटी परिसरात THDCच्या जलविद्युत प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Independence Day : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी लाल किल्ला सज्ज

नवी दिल्ली : यंदा शनिवार १५ ऑगस्ट २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत लाल किल्ल्यावर ८० वा