Jharkhand News : झारखंडमध्ये वीज कोसळून ७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये महिला आणि १० वर्षीय मुलाचा समावेश

झारखंड : झारखंडमध्ये (Jharkhand) मान्सूनपूर्व (Pre-Monsoon) काळात वीज कोसळण्याच्या (Lightning Strike) घटनांमध्ये गेल्या २४ तासांत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि एका १० वर्षीय मुलाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.


पोलीस (Police) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रांची (Ranchi) आणि गरवा (Garhwa) जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला असून दोन्ही ठिकाणी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. रांची जिल्ह्यातील पिथोरिया (Pithoria) परिसरातील बरहू गावचे जितू महाली (५५) आणि कटमकुली गावातील निराशा देवी (३३) हे शेतात काम करत असताना त्यांच्यावर वीज कोसळली. या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी (Postmortem) पाठवण्यात आले आहेत.



दरम्यान, गरवा जिल्ह्यातील सुंडी गावातील रीना देवी (३०) आणि मुकुंदपूर गावातील राम अवतार पाल (६५) यांचाही वीज पडून मृत्यू झाला. याशिवाय छत्रा (Chatra), गिरिडीह (Giridih) आणि सेराईकेला-खरसावन (Seraikela-Kharsawan) जिल्ह्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये आणखी तीन जणांचा जीव गेला.


झारखंडमध्ये सध्या हवामानातील (Weather) बदलांमुळे वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून प्रशासनाने (Administration) नागरिकांना सतर्क (Alert) राहण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, तपास यंत्रणा सतर्क

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना जीवे

Gujarat ATS : गुजरात एटीएसकडून जैश-ए-मोहम्मदच्या संशयित मॉड्यूलचा पर्दाफाश , ८ आरोपी अटकेत

अहमदाबाद : गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अनेक राज्यांमध्ये संयुक्त कारवाई करत, बंदी घातलेल्या

Waterfall Trip : धबधब्याखाली भिजायचंय? मग हे 5 वॉटरप्रूफ गॅझेट्स नक्की सोबत ठेवा

वॉटरफॉल ट्रिपची तयारी झाली? धबधब्याखाली (Waterfall) मनसोक्त भिजण्याचा आनंद घ्या, पण तुमचा फोन, गॅझेट्स (Gadgets) आणि

Totapuri mango : तोतापुरी आंबा क्षेत्राच्या सर्वसमावेशक मूल्यांकनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश

नवी दिल्ली : आंध्रप्रदेशातील तोतापुरी आंबा उत्पादकांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे परीक्षण करण्यासाठी आणि या

PM Internship Scheme : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना तिसऱ्या टप्प्यात तरुणांसाठी मोठी संधी

पुणे : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून

Anti Terror Operation : जैशच्या ८ संशयित दहशतवाद्यांना अटक

गुजरात : देशाची सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, गुजरात एटीएस (Gujarat ATS) आणि दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) केलेल्या