Raigad Crime : पत्नी व दोन मुलींच्या मृत्यूप्रकरणी पतीला अटक; माणगाव पोलिसांची कारवाई

रायगड : माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासीवाडी येथे घडलेल्या धक्कादायक कौटुंबिक दुर्दैवी घटनेप्रकरणी माणगाव पोलिसांनी संबंधित पतीला अटक केली आहे. पत्नीला वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप त्याच्यावर असून, या छळाला कंटाळून महिलेने आपल्या चार मुलांना विषारी औषध कोल्ड्रिंकमध्ये मिसळून दिल्याचा आरोप आहे. या घटनेत दोन मुलींचा मृत्यू झाला असून महिलेनेही विषारी पेय प्राशन करून आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० मार्च २०१६ ते १३ जून २०२६ या कालावधीत आरोपीने खरवली आदिवासीवाडी येथील आपल्या पत्नीला वारंवार शिवीगाळ करून मानसिक आणि शारीरिक छळ केला. या त्रासाला वैतागून महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. विषारी औषध मिसळलेले कोल्ड्रिंक आपल्या चार मुलांना पाजल्यानंतर तिने स्वतःही ते प्राशन केले. उपचारादरम्यान दोन मुली व महिलेचा मृत्यू झाला.या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८१/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१), १०९(१), १२३, १०८, ११५(२), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर प्रकरणातील आरोपीला १४ जून २०२६ रोजी पहाटे अटक करण्यात आली. या गंभीर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले करीत आहेत.

Comments
Add Comment

Mankhurd : मानखुर्दमध्ये चाळीचा भाग कोसळला, पाच जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

मुंबई : मुंबईत सतत पडत असलेल्या पावसामुळे मानखुर्दमध्ये एक मोठी दुर्घटना झाली आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरांतील

Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण' लवकरच ताफ्यात येणार

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढणार असून लवकरच ‘आयएनएस महेंद्रगिरी’ आणि ‘आयएनएस मालवण’ या दोन

School - College Holidays : मोठी बातमी! मुंबई, ठाणे, पनवेलसह सर्व शाळा-महाविद्यालयांना उद्या सुटी; मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचा महत्वाचा निर्णय

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे आणि पनवेल येथे सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी ऑरेंज अलर्ट जारी करत मुसळधार

Prakash Abitkar : वारीत अत्यावश्यक रुग्णांसाठी प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा!

भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची आणि आरोग्य संपन्न वारी या डिजिटल उपक्रमाची सुरुवात मुंबई : आषाढी यात्रेच्या

Indian Navy : भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या सिंगापूर भेटीची यशस्वी सांगता

नवी दिल्ली : भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ सामरिक आणि सागरी भागीदारी अधिक मजबूत करत भारतीय नौदलाच्या पूर्व

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; विक्रोळी येथे बोअरिंगचे काम सुरू

मुंबई (Mumbai): मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पासाठी, पहिल्या टनेल बोरिंग मशीनने (TBM) आज विक्रोळी