Raigad Crime : पत्नी व दोन मुलींच्या मृत्यूप्रकरणी पतीला अटक; माणगाव पोलिसांची कारवाई

रायगड : माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासीवाडी येथे घडलेल्या धक्कादायक कौटुंबिक दुर्दैवी घटनेप्रकरणी माणगाव पोलिसांनी संबंधित पतीला अटक केली आहे. पत्नीला वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप त्याच्यावर असून, या छळाला कंटाळून महिलेने आपल्या चार मुलांना विषारी औषध कोल्ड्रिंकमध्ये मिसळून दिल्याचा आरोप आहे. या घटनेत दोन मुलींचा मृत्यू झाला असून महिलेनेही विषारी पेय प्राशन करून आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० मार्च २०१६ ते १३ जून २०२६ या कालावधीत आरोपीने खरवली आदिवासीवाडी येथील आपल्या पत्नीला वारंवार शिवीगाळ करून मानसिक आणि शारीरिक छळ केला. या त्रासाला वैतागून महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. विषारी औषध मिसळलेले कोल्ड्रिंक आपल्या चार मुलांना पाजल्यानंतर तिने स्वतःही ते प्राशन केले. उपचारादरम्यान दोन मुली व महिलेचा मृत्यू झाला.या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८१/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१), १०९(१), १२३, १०८, ११५(२), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर प्रकरणातील आरोपीला १४ जून २०२६ रोजी पहाटे अटक करण्यात आली. या गंभीर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले करीत आहेत.

Comments
Add Comment

Mirabai Chanu : मीराबाई चानूची सोनेरी हॅटट्रिक!

ग्लासगो : भारताची स्टार वेटलिफ्टर आणि ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानू हिने ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा

Ind vs Zim : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने जिंकली पहिली टी-२० मालिका; झिम्बाब्वेचा ३-० ने व्हाईटवॉश !

भारताचा ३५ धावांनी दणदणीत विजय ! हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Question Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीविरोधी नवीन विधेयक लोकसभेत सादर होणार

नवी दिल्ली: प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणावरून संसदेत निर्माण झालेला गतिरोध आता संपण्याची चिन्हे असून, आंदोलक

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Narendra Modi : परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात उच्चाधिकार समितीची स्थापना, PM मोदींचा निर्णय

नवी दिल्ली : परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात