Raigad Crime : पत्नी व दोन मुलींच्या मृत्यूप्रकरणी पतीला अटक; माणगाव पोलिसांची कारवाई

रायगड : माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासीवाडी येथे घडलेल्या धक्कादायक कौटुंबिक दुर्दैवी घटनेप्रकरणी माणगाव पोलिसांनी संबंधित पतीला अटक केली आहे. पत्नीला वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप त्याच्यावर असून, या छळाला कंटाळून महिलेने आपल्या चार मुलांना विषारी औषध कोल्ड्रिंकमध्ये मिसळून दिल्याचा आरोप आहे. या घटनेत दोन मुलींचा मृत्यू झाला असून महिलेनेही विषारी पेय प्राशन करून आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० मार्च २०१६ ते १३ जून २०२६ या कालावधीत आरोपीने खरवली आदिवासीवाडी येथील आपल्या पत्नीला वारंवार शिवीगाळ करून मानसिक आणि शारीरिक छळ केला. या त्रासाला वैतागून महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. विषारी औषध मिसळलेले कोल्ड्रिंक आपल्या चार मुलांना पाजल्यानंतर तिने स्वतःही ते प्राशन केले. उपचारादरम्यान दोन मुली व महिलेचा मृत्यू झाला.या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८१/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१), १०९(१), १२३, १०८, ११५(२), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर प्रकरणातील आरोपीला १४ जून २०२६ रोजी पहाटे अटक करण्यात आली. या गंभीर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले करीत आहेत.

Comments
Add Comment

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे