Palghar Accident : शिरसाड-वज्रेश्वरी मार्गावर भीषण अपघात; ट्रकच्या चाकाखाली चिरडून एकाचा मृत्यू

पालघर:  पालघर जिल्ह्यातील शिरसाड-वज्रेश्वरी मार्गावर एक भीषण अपघात (Accident) घडला. हा अपघात शुक्रवारी सकाळी घडला. या अपघातात पारोळ गावातील उद्योजक, शेतकरी रवींद्र गोपाळ पाटील (Ravidra Patil) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे वसई आणि पारोळ परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. (Palghar Accident)



प्राथमिक माहितीनुसार, रवींद्र पाटील हे आपल्या दुचाकीवरून पारोळहून शिरसाडकडे जात होते. शिरसाड नाका परिसरात त्यांच्या पुढे धावणाऱ्या एका हायवा टिपिंग ट्रकने कोणताही इंडिकेटर न देता अचानक डावीकडे वळण घेतले. ट्रक अचानक आडवा आल्याने पाटील यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची दुचाकी थेट ट्रकच्या मागील चाकाखाली गेली.


अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, ट्रकच्या अवजड चाकाखाली चिरडल्याने रवींद्र पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.


घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. तसेच अपघातास कारणीभूत ठरलेल्या हायवा ट्रक चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



दरम्यान, शिरसाड-वज्रेश्वरी मार्गावर ओव्हरलोड रेती आणि खडी वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकांमुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अशा वाहनांवर आरटीओ आणि पोलिसांनी कठोर कारवाई करावी, तसेच मार्गावरील वाहतूक सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


रवींद्र गोपाळ हे एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. रवींद्र यांच्या जाण्याने राजकारणात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Dog Attack : रेबीजमुळे चिमुकल्या समर्थ स्वामीचा दुर्दैवी मृत्यू; भटक्या कुत्र्यांवर कारवाईची मागणी

सोलापूर : भवानी पेठ परिसरातील घोंगडे वस्ती येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या समर्थ स्वामी या

Amravati News : धक्कादायक! आश्रमशाळेतील ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; जेवणानंतर उलट्या, पोटदुखीने उडाली खळबळ

अमरावती : अमरावतीच्या मेळघाट परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धारणी तालुक्यातील टीटंबा येथील शासकीय

Mumbai-Pune Water Update : मुंबई-पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! धरणांत मुबलक जलसाठा; पाहा कोणत्या तलावात किती टक्के पाणी ?

मुंबई : यंदाच्या मान्सूनने सुरुवातीला हुलकावणी दिली असली, तरी जुलै महिन्यात मुंबई (Mumbai) आणि पुण्याच्या पाणलोट

Ashadhi Ekadashi 2026 : विठ्ठलाच्या मूर्तीवरील प्रत्येक खूण सांगते एक कथा! जाणून घ्या दडलेले आध्यात्मिक अर्थ

विठ्ठलाच्या (Vitthal) मूर्तीवरील प्रत्येक खूण का आहे खास? https://prahaar.in/2026/07/25/pune-metro-news-hinjawadi-shivajinagar-pune-metro-li

Pune Metro : IT कर्मचाऱ्यांची ट्रॅफिकमधून सुटका! हिंजवडी मेट्रोला अखेर 'ग्रीन सिग्नल'; माण ते बालेवाडी प्रवासी सेवेचा मार्ग मोकळा

पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडीची डोकेदुखी ठरलेल्या हिंजवडी IT पार्कच्या प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक आणि मोठी