Sheetal Mhatre : सिद्धिविनायक मंदिराच्या पुनर्विकासात देऊबाई पाटील यांच्या स्मृती जपण्याची मागणी

शिवसेना उपनेत्या, प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची मागणी


न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांच्याकडे पत्राद्वारे मागणी


मुंबई : सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईची इष्टदेवता आहे. या मंदिरात महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. सिद्धिविनायक मंदिराच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून ५०० ते ६०० कोटींचा निधी देण्यात आला आहे. या पुनर्विकासात मंदिराची स्थापना करणाऱ्या येथील आगारी समाजाच्या देऊबाई पाटील यांच्या स्मृतींचे जतन व्हावे, अशी मागणी शिवसेना उपनेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर आणि न्यासाच्या सदस्या मीनाताई कांबळी यांच्याकडे केली आहे.



लवकरच सिद्धिविनायक मंदिराचा पुनर्विकास केला जाणार आहे. मात्र शेकडो वर्षांपूर्वी देऊबाई पाटील या आगारी समाजातील स्थानिक महिलेने स्वखर्चाने या मंदिराची स्थापना केली होती. त्यामुळे मंदिराचा पुनर्विकास करताना देऊबाई पाटील या महिलेचा यथोचित सन्मान व्हावा किंवा पाटील दाम्प्त्याचा कायमस्वरुपी तिथं नामफलक किंवा कोनशिलेवर उल्लेख व्हावा, अशी मागणी मंदिर न्यासाकडे करण्यात आल्याचे शिवसेना उपनेत्या, प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सांगितले.


ज्यांच्यामुळे मंदिर उभं राहिलं त्या देऊबाई पाटील यांच्या स्मृतींचे पुनर्विकासानंतर मंदिर परिसरात जतन व्हावे, त्यांच्या वारसांना तेथे जागा देण्यात यावी, याकरिता मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवरणकर आणि सदस्या मीनाताई कांबळी यांना पत्राद्वारे मागणी केल्याचे शीतल म्हात्रे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : शेती, शेतरस्त्याच्या भांडणात आता ई-मेलवर मिळालेली नोटीस ग्राह्य

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय; बाधित शेतकऱ्यांना मिळणार 'मोफत' पोलीस संरक्षण मुंबई : ग्रामीण

Devendra Fadnavis : नीती आयोगाच्या निर्देशांकांवर पुढील ४ वर्षांत परिणामकारक कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

Pavana Dam : पवना धरण ९३ टक्क्यांहून अधिक भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मावळ : मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

Ashadhi Wari Charan Seva : ‘चरणसेवा’ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य; १४ जिल्ह्यांतील ४.९६ लाख वारकऱ्यांना थेट लाभ

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा २४ जुलै रोजी समारोप; १४०

Maharashtra Cyber ​​Cell : महाराष्ट्र सायबर सेल कात टाकणार

- केंद्र सरकारच्या धर्तीवर 'हायटेक' रचना; सर्व यंत्रणा येणार एका छताखाली मुंबई : वाढत्या सायबर गुन्ह्यांवर वेगाने

Nitesh Rane : चिपी विमानतळाला जलमार्गांनी जोडणार

मंत्री नितेश राणे यांची घोषणा; १५ ऑगस्टपासून नवी मुंबई-चिपी विमानसेवा सुरू होणार मुंबई : "सिंधुदुर्ग जिल्ह्याचा