Sheetal Mhatre : सिद्धिविनायक मंदिराच्या पुनर्विकासात देऊबाई पाटील यांच्या स्मृती जपण्याची मागणी

शिवसेना उपनेत्या, प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची मागणी


न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांच्याकडे पत्राद्वारे मागणी


मुंबई : सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईची इष्टदेवता आहे. या मंदिरात महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. सिद्धिविनायक मंदिराच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून ५०० ते ६०० कोटींचा निधी देण्यात आला आहे. या पुनर्विकासात मंदिराची स्थापना करणाऱ्या येथील आगारी समाजाच्या देऊबाई पाटील यांच्या स्मृतींचे जतन व्हावे, अशी मागणी शिवसेना उपनेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर आणि न्यासाच्या सदस्या मीनाताई कांबळी यांच्याकडे केली आहे.



लवकरच सिद्धिविनायक मंदिराचा पुनर्विकास केला जाणार आहे. मात्र शेकडो वर्षांपूर्वी देऊबाई पाटील या आगारी समाजातील स्थानिक महिलेने स्वखर्चाने या मंदिराची स्थापना केली होती. त्यामुळे मंदिराचा पुनर्विकास करताना देऊबाई पाटील या महिलेचा यथोचित सन्मान व्हावा किंवा पाटील दाम्प्त्याचा कायमस्वरुपी तिथं नामफलक किंवा कोनशिलेवर उल्लेख व्हावा, अशी मागणी मंदिर न्यासाकडे करण्यात आल्याचे शिवसेना उपनेत्या, प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सांगितले.


ज्यांच्यामुळे मंदिर उभं राहिलं त्या देऊबाई पाटील यांच्या स्मृतींचे पुनर्विकासानंतर मंदिर परिसरात जतन व्हावे, त्यांच्या वारसांना तेथे जागा देण्यात यावी, याकरिता मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवरणकर आणि सदस्या मीनाताई कांबळी यांना पत्राद्वारे मागणी केल्याचे शीतल म्हात्रे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Independence Day 2026 : महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष! जाणून घ्या मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपर्यंत कुठे कोण फडकवणार तिरंगा?

मुंबई : भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी देशभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

Pratap Sarnaik : एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

१ कोटींहून अधिक प्रवाशांची नोंदणी; ६४ लाखांहून अधिक कार्डे

Mumbai Rain Update : मुंबईत आज पुन्हा पावसाचा जोर वाढणार! शहर-उपनगरात मध्यम सरी, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, आजही शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर कायम

Vakola Unauthorized Shops : वाकोलातील पदपथांवरील ३७ अनधिकृत दुकानांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांवर पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून

Har Ghar Tiranga : प्रत्येक विभागात निघणाऱ्या तिरंगा रॅलीत मुंबईकरांनी सहभागी व्हावे

- मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबईकरांना आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक

Mumbai Water Cut : मुंबईकरांवरील कपात कायम, पण जलतरण तलावांचा पाणी पुरवठा पूर्वव्रत

- तलावांमधील पाणी अद्यापही ९० टक्क्यांच्या पुढे जाईना मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा