Solapur Accident : बार्शी-परंडा मार्गावर भीषण अपघात; खांडवीतील दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी अंत

सोलापूर: परंडा-बार्शी मार्गावरील वारदवाडी परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात (Accident) खांडवी (ता. बार्शी) येथील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू (Death) झाला. अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे खांडवी गावावर शोककळा पसरली आहे. (Solapur Accident)



मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही शेतकरी 8 जून रोजी परंडा येथील साखर कारखान्यात उसाच्या बिलाबाबत चौकशी करण्यासाठी गेले होते. कारखान्यातील काम पूर्ण करून ते आपल्या होंडा दुचाकीवरून (एमएच 13 एफडी 7058) खांडवी गावाकडे परतत होते. यावेळी वारदवाडीजवळ मागून भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. मृत शेतकऱ्यांची नावे सर्जेराव कोंडीबा पाटील (वय 60) आणि बाबासाहेब भागवत गव्हाणे (वय 55) अशी आहेत.


धडक इतकी भीषण होती की सर्जेराव पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या बाबासाहेब गव्हाणे यांना तातडीने बार्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचीही प्राणज्योत मालवली.



अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून फरार वाहनाचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


दिवसभर शेती आणि कारखान्याच्या कामानिमित्त बाहेर पडलेल्या या दोन्ही शेतकऱ्यांचा रात्री अपघातात मृत्यू झाल्याने खांडवी गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनामुळे गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले असून या प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

Mahabaleshwar Heavy Rainfall : महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नावली गावातील काही भाग खचला

- प्रशासनाने केले नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर; गावाला कोणताही धोका नाही - नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू

पंढरपुरात मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या भक्तनिवासाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

पंढरपूर : पंढरपूर येथे मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्यावतीने उभारण्यात आलेल्या धर्मशाळा-भक्तनिवासाच्या

Onion Farmers : केंद्र सरकारकडून कांदा उत्पादकांना दिलासा

सरकारी खरेदीदरात १३ टक्क्यांनी वाढ; प्रति क्विंटल २ हजार १२५ रुपये दर निश्चित मुंबई : कांदा उत्पादक

Ratnagiri News : धक्कादायक! दिड वर्षांच्या चिमुकल्यासह आईने मारली मांडवी एक्सप्रेसमधून उडी

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक (Ratnagiri News) अत्यंत धक्कादायक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.

Jalna Bus Accident : जालना-बीड महामार्गावर भीषण अपघात! दोन एसटी बसची समोरासमोर धडक; चालकांसहअनेक प्रवासी जखमी

जालना : जालना-बीड महामार्गावर शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. अंबड तालुक्यातील शहापूरजवळ गल्हाटी नदीच्या पुलावर