Beed Boat Tragedy : बीडमध्ये मोठी दुर्घटना! गोदावरीत भाविकांची बोट उलटली; 3 महिलांचा मृत्यू

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी नदीत भाविकांनी भरलेली बोट उलटल्याने (Boat capsizing) मोठी दुर्घटना घडली. या अपघातात तीन महिलांचा मृत्यू (3 Women Death) झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. बोट बुडत असतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या घटनेची गंभीरता अधिक अधोरेखित झाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी आलेले भाविक नदी पार करण्यासाठी बोटीतून प्रवास करत होते. यावेळी अचानक बोटीचा ताबा सुटल्याने ती नदीपात्रात उलटली. बोटीत 50 हून अधिक भाविक असल्याची माहिती समोर आली असून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्यामुळेच दुर्घटना घडल्याचा आरोप भाविकांकडून केला जात आहे.


या दुर्घटनेत प्रमिला शेषराव राठोड (रा. लोणार) यांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला. तर कांताबाई ज्ञानदेव आंधळे (रा. सिंदखेडराजा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय आणखी एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून तिची ओळख अद्याप पटलेली नाही. सिंधुबाई अर्जुन मावळे (रा. महागाव) यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.


घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अनेक भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



दरम्यान, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते का, तसेच अपघातामागील नेमके कारण काय, याचा तपास उपविभागीय अधिकाऱ्यांकडून केला जाणार आहे. चौकशी अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले असून या प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

Mahabaleshwar Heavy Rainfall : महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नावली गावातील काही भाग खचला

- प्रशासनाने केले नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर; गावाला कोणताही धोका नाही - नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू

पंढरपुरात मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या भक्तनिवासाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

पंढरपूर : पंढरपूर येथे मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्यावतीने उभारण्यात आलेल्या धर्मशाळा-भक्तनिवासाच्या

Onion Farmers : केंद्र सरकारकडून कांदा उत्पादकांना दिलासा

सरकारी खरेदीदरात १३ टक्क्यांनी वाढ; प्रति क्विंटल २ हजार १२५ रुपये दर निश्चित मुंबई : कांदा उत्पादक

Ratnagiri News : धक्कादायक! दिड वर्षांच्या चिमुकल्यासह आईने मारली मांडवी एक्सप्रेसमधून उडी

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक (Ratnagiri News) अत्यंत धक्कादायक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.

Jalna Bus Accident : जालना-बीड महामार्गावर भीषण अपघात! दोन एसटी बसची समोरासमोर धडक; चालकांसहअनेक प्रवासी जखमी

जालना : जालना-बीड महामार्गावर शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. अंबड तालुक्यातील शहापूरजवळ गल्हाटी नदीच्या पुलावर