Crime News: भाईंदरमध्ये खळबळ! खारफुटीत सापडलेल्या जळालेल्या मृतदेहाच्या प्रकरणाचा उलगडा, तीन सख्खे भाऊ अटकेत

भाईंदर : भाईंदर (Bhayandar) पूर्व परिसरातील खारफुटीच्या जंगलात सापडलेल्या जळालेल्या आणि कुजलेल्या मृतदेहाच्या (Deathbody) प्रकरणाचा नवघर पोलिसांनी उलगडा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन सख्ख्या भावांना अटक (Attack) केली असून पैशांच्या वादातून ही हत्या (Murder) झाल्याचे तपासात समोर आले आहे. (Bhayandar crime)


मिळालेल्या माहितीनुसार, 5 जून रोजी सायंकाळी सचिन तेंडुलकर मैदानासमोरील खारफुटीच्या परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने सुरुवातीला ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. घटनास्थळावर कोणतेही ओळखपत्र किंवा अन्य वस्तू सापडल्या नव्हत्या. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.



दरम्यान, आसपासच्या पोलीस ठाण्यांमधील हरवलेल्या व्यक्तींच्या नोंदी तपासताना 1 जून रोजी हरवल्याची तक्रार दाखल झालेल्या गौरव विजयप्रकाश बदसर (वय 25) या तरुणाशी मृतदेहाचा संबंध असल्याचा संशय आला. सायबर तपास आणि कुटुंबीयांकडून ओळख पटवल्यानंतर मृतदेह गौरवचाच असल्याचे स्पष्ट झाले.


यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा बदलली. चौकशीत काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीनंतर तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली.



तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि गौरव यांच्यात पैशांच्या व्यवहारातून जुना वाद होता. या वादातूनच तिघांनी गौरवच्या हत्येचा कट रचला. त्यांनी गौरवला दारू पिण्याच्या बहाण्याने सोबत नेले. तो नशेत गेल्यानंतर त्याला निर्जन खारफुटी भागात नेऊन चाकूने वार करत ठार मारल्याचा आरोप आहे.


पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक

Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता मुंबई : महसूल

MIDC Maharashtra : वैभववाडी 'MIDC'ला मूर्त रूप, पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री उदय सामंतांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक मुंबई :

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील आठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,