Nitesh Rane : राज्यातील मासेमारी बंदी कालावधी १६ दिवसांनी वाढणार - मंत्री नितेश राणे यांचे सूतोवाच

- 'सिल्व्हर पापलेट'सह इतर प्रजातींच्या उत्पादनात होणार वाढ


मुंबई : राज्यातील मत्स्य साठ्याचे संवर्धन आणि एकूण मत्स्य उत्पादन वाढीसाठी दरवर्षी लागू असणारा पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी आणखी १६ दिवसांनी वाढवण्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू आहे. सध्या ६१ दिवसांची असणारी ही बंदी ७६ दिवसांपर्यंत नेल्यास समुद्रातील माशांच्या प्रजोत्पादनाला मोठा वाव मिळेल आणि परिणामी राज्यातील मत्स्य उत्पादनात मोठी वाढ होईल, असे सूतोवाच मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एका मुलाखतीत केले आहे. शासनाच्या या प्रस्तावित निर्णयाचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम कोकण किनारपट्टीवरील अत्यंत लोकप्रिय असलेल्या 'सिल्व्हर पापलेट'सह इतर प्रमुख माशांच्या प्रजातींच्या उत्पादन वाढीवर होणार आहे.



">मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अलीकडेच मंत्रालयात आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याच्या प्रस्तावावर प्रामुख्याने चर्चा झाली. सध्या राज्यात दरवर्षी १ जून ते ३१ जुलै या ६१ दिवसांच्या कालावधीत यांत्रिक व यंत्रचलित नौकांना मासेमारीसाठी बंदी लागू असते. हा काळ माशांच्या प्रजोत्पादनाचा (पैदाशीचा) असल्याने या काळात मासेमारी पूर्णपणे थांबवल्यास माशांच्या बीज निर्मिती प्रक्रियेला गती मिळते आणि समुद्रातील नैसर्गिक साठा वाढण्यास मदत होते. या पार्श्वभूमीवर, बंदीचा कालावधी वाढवून तो १५ ऑगस्टपर्यंत केल्यास मत्स्य उत्पादनात शाश्वत आणि भरीव वाढ होईल, असा तज्ज्ञांचा आणि शासनाचा अंदाज आहे. (Nitesh Rane)



नेमकी गरज का?


गेल्या काही वर्षांपासून समुद्रातील बदलणारे हवामान, वाढती चक्रीवादळे आणि प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे १ ऑगस्टनंतरही मच्छीमारांना समुद्रात जाणे अनेकदा शक्य होत नाही. दुसरीकडे, जगभरातील अनेक प्रमुख सागरी देश आणि भारतामधील शेजारील गुजरात राज्याने निसर्ग संवर्धन आणि मत्स्य उत्पादन वाढीसाठी ७६ दिवसांची बंदी यशस्वीरीत्या लागू केली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातही बंदीचा कालावधी ७६ दिवस (१ जून ते १५ ऑगस्ट) करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. (Nitesh Rane)

Tags
maharashtrafishingnitesh raneMaharashtra newsFishing ban periodextended by 16 days
Comments
Add Comment

Fire Station : चांदिवलीमध्ये अग्निशमन दलाची होणार उभारणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) चांदिवली (Chandiwali)  येथे नव्याने अग्निशमन केंद्र (Fire station) उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या

BMC News : सखल भागांमध्ये अश्वशक्तीने महापालिका करणार प्रयत्न, साचलेले पाणी उचलून फेकणार

- मुंबईतील आठ ठिकाणी पुढील तीन वर्षांसाठी भाडेतत्वावर पंपाची सुविधा - तब्बल १२३ कोटी रुपये करणार खर्च मुंबई (सचिन

BMC News : रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी तब्बल १४ कंत्राटदारांची निवड, यंदा केवळ ४२ कोटींचीच कामे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या मोठ्याप्रमाणात सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे हाती घेण्यात आल्यामुळे

Tree Plantation on Coastal Road : विस्तारीत कोस्टल रोड, गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पात १७७८ झाडे बाधित, बदल्यात लावणार सुमारे १६ हजार झाडे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई किनारी रस्ते प्रकल्प (उत्तर) वर्सोवा आंतरबदल ते दहिसर भाईंदर मार्गावरील दहिसर

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! नव्या आरक्षण प्रणालीमुळे तिकीट बुकिंग होणार अधिक सोपं

मुंबई : भारतीय रेल्वे (Indian Railways) प्रवाशांसाठी एक मोठं तांत्रिक अपग्रेड (Technological Upgrade) घेऊन येत आहे. तब्बल ४० वर्षांपासून

Crime News: भाईंदरमध्ये खळबळ! खारफुटीत सापडलेल्या जळालेल्या मृतदेहाच्या प्रकरणाचा उलगडा, तीन सख्खे भाऊ अटकेत

भाईंदर : भाईंदर (Bhayandar) पूर्व परिसरातील खारफुटीच्या जंगलात सापडलेल्या जळालेल्या आणि कुजलेल्या मृतदेहाच्या (Deathbody)