Sangli Crime : धक्कादायक! 30 लाखांच्या विम्यासाठी मेहुण्यानेच रचला कट; सांगलीतील खुनाचे गूढ उलगडले

सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात उघडकीस आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. मिरज-पंढरपूर महामार्गावर संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत (Deathbody) आढळलेल्या दत्तात्रय चाबरे यांच्या मृत्यूमागे अपघात नसून नियोजित खून (Murder) असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, विम्याची रक्कम मिळवण्यासाठी हा कट मृत व्यक्तीच्या मेहुण्यानेच रचल्याचा आरोप आहे. (Sangli Murder Case)


मिळालेल्या माहितीनुसार, १९ मे रोजी दत्तात्रय चाबरे यांचा मृतदेह महामार्गालगत आढळून आला होता. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचे मानले जात होते. मात्र घटनास्थळावरील काही बाबी संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास पुढे नेत असताना धक्कादायक माहिती समोर आली.



तपासात असे निष्पन्न झाले की, दत्तात्रय चाबरे यांच्या नावावर ३० लाख रुपयांचा अपघाती विमा काढण्यात आला होता. या विम्याचे हप्तेही त्यांचे मेहुणे रामचंद्र खिलारे भरत होते. विम्याची रक्कम मिळवण्यासाठी चाबरे यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे भासवण्याचा कट रचण्यात आल्याचा संशय पोलिसांना आला.


यासाठी रामचंद्र खिलारे याने तुकाराम सांगोलकर याला ३ लाख रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात समोर आले आहे. दोघांनी मिळून चाबरे यांची हत्या करून तिला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.


या प्रकरणी पोलिसांनी रामचंद्र खिलारे आणि तुकाराम सांगोलकर या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची पुढील चौकशी सुरू असून या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.


या प्रकरणाचा उलगडा केल्यानंतर पोलिसांच्या तपासाचे सर्वत्र कौतुक होत असून विम्याच्या पैशांसाठी नातेसंबंधांनाही तिलांजली दिल्याची ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.

Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून